शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

राज्यात भाजपाची सत्ता येणार डाॅ. भामरेंच्या या विधानाला माजी मंत्री महाजन यांचा छेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST

महापालिकेच्या आवारात सुवर्णकार समाजाचे संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री ...

महापालिकेच्या आवारात सुवर्णकार समाजाचे संतश्रेष्ठ नरहरी महाराज यांच्या पुतळ्याचा लोकापर्ण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, नगराध्यक्ष भूपेश पटेल, महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आयुक्त अजिज शेख, नंदकुमार वडनेरे, माजी महापौर कल्पना महाले, जयश्री अहिरराव, उपमहापौर , स्थायी समिती सभापती संजय जाधव, सभागृह नेते राजेश पवार, विरोधी पक्षनेते कमलेश देवरे, महिला व बालकल्याण सभापती वंदना थोरात उपस्थित होते.

या कार्यक्रमात खासदार डॉ.भामरे आणि आमदार महाजन हे व्यासपीठावर जवळ - जवळ बसले होते. कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये चर्चा सुरु होती. कार्यक्रमात आधी खासदार डॉ.सुभाष भामरे हे बोलण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राज्याचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी आता आपली चर्चा सुरु असतांना त्यांनी माझ्या कानात आताच सांगितले की, सहा महिन्यात राज्यात भाजपाची सत्ता बसणार आहे आणि मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील. त्यामुळे देवपूर येथील रस्त्यासाठी राज्य शासनाकडून ३०० कोटींचा निधी मिळवून देणार आहेत. त्यामुळे आगामी काळात धुळेकरांचे प्रश्न सुटणार आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर त्याठिकाणी उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.

मात्र त्यांचे भाषण संपल्यावर बोलण्यास उभे राहिलेले आमदार गिरीश महाजन म्हणाले की, बाबांच्या ऐकण्यात गडबड झाली राज्यात सहा महिन्यात सत्ता येईल असे म्हणालोच नाही. दोंडाईचा येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भारती पवार आले आहेत. त्याचे मला दोन वेळा फोन येऊन गेला की, कार्यक्रमात नेते कोणीही उपस्थित नाही. त्यामुळे मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे गरजेचे आहे. मात्र सुवर्णकार समाजाचा कार्यक्रम सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे मी डाॅ. भामरे सांगितले की, थोडा वेळ थांबू, मात्र त्यांनी वेगळेच ऐकले, त्यांच्या ऐकण्यात गडबड झाली. राज्यात सहा महिन्यात भाजपाची सत्ता येईल असे की बोललोच नाही. मात्र तुमचा शब्द खरा ठरो आणि सहा महिन्यात भाजपाची सत्ता येवो,असे महाजन यांनी सांगितले. दरम्यान माजी मंत्री भामरे व महाजन यांच्या विधानामुळे कार्यक्रमात तर्कवितर्क काढले जात होते.