शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

निवडणूक झालीच तर आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, भाजपचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:24 IST

धुळे : राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ८५ जागा तसेच या ...

धुळे : राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील ८५ जागा तसेच या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागा आधी नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी राखीव होत्या. आता या जागा सर्वसाधारण समजून निवडणूक होत आहे. हा अत्यंत अन्यायकारक व धोकादायक निर्णय असून निवडणूक झाली आणि त्यात काही जीवितहानी झाली तर आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार काशीराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

समतेच्या तत्त्वानुसार ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला. राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य रीतीने बाजू मांडली नाही म्हणून न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सध्या रद्द केले आहे. तथापि, न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणाची संकल्पना नाकारलेली नाही तर केवळ त्याचे प्रमाण किती असावे हे ठरविण्यासाठी समर्पित मागास आयोग तयार करून ओबीसींचा इंपिरिकल डेटा मागितला आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत त्यांच्यासाठीच्या जागा सर्वसाधारण समजून निवडणुका घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची व संबंधित जागांची पोटनिवडणूक न घेण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

याशिवाय सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. तसेच तिसऱ्या लाटेचा धोका आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर उच्चपदस्थांनी सांगितलेले आहे. अशा स्थितीत वरील पाच जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या काही जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविणे अत्यंत धोकादायक आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात प्रचारामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे. निवडणुकीमुळे कोरोनाची साथ या ठिकाणी पुन्हा बळावण्याचा व ती पुन्हा राज्यभर पसरण्याचा धोका आहे. यामुळे लोकांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. अर्थात निवडणूक आयोगाचा हा निर्णय धोकादायक असून तो मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. जयकुमार रावल, खा. डॉ. सुभाष भामरे, आ. काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, बबन चौधरी, गटनेते कामराज निकम, सुभाष दादा देवरे, अरविंद जाधव, बापू खलाने, आशुतोष पाटील, हिरामण गवळी, संग्राम पाटील, वीरेंद्र गिरासे, किशोर संघवी यांच्यासह अनेक भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.