शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

भाजपा एकसंघ मात्र महाआघाडीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST

शेजारील जळगाव जिल्ह्याप्रमाणे याठिकाणीही महाविकास आघाडी उलटफेर करु शकेल, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची हवाच महापौर निवडीनंतर निघून ...

शेजारील जळगाव जिल्ह्याप्रमाणे याठिकाणीही महाविकास आघाडी उलटफेर करु शकेल, असा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची हवाच महापौर निवडीनंतर निघून गेली. उलट निकालानंतर एक स्पष्ट झाले की, महाविकास आघाडीत शेवटपर्यंत एकसूत्रता किंवा एकजूट नव्हती. महाविकास आघाडीत महापौर निवडणुकीसाठी सुरुवातीपासून राजकीय हालचालीत राष्ट्रवादी अग्रसेर होती. राष्ट्रवादी महानगर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी यात आघाडी घेतली होती. भाजपाच्या महापौर पदासाठी इच्छुक नगरसेवकांच्या एका गटाशी ते गेले काही दिवस नव्हे तर महिन्यापासून संपर्कात होते. त्यांच्या या नगरसेवकांसोबत बैठकाही झाल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित बैठक घेतली. पण नंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याची जशी वेळ जवळ येत गेली तशी राष्ट्रवादीही मागे पडत गेली. यासाठी राष्ट्रवादीतीलच एक गट हा या सर्व राजकीय हालचालीमुळे नाखुश होता. तो गट यात रस दाखवित नसल्याने शेवटी या सर्व राजकीय हालचालीतून राष्ट्रवादी मागे पडली. महाविकास आघाडीतील अन्य सर्व पक्षातीलही काही नेते या सर्वांपासून वेगळे राहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरुवातीला वेगाने घडणाऱ्या राजकीय हालचालींना ब्रेक लागला. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही महाविकास आघाडीत एकमत दिसून आले नाही. कारण शिवसेना आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले.

मतदानाच्या वेळीसुद्धा काँग्रेस - राष्ट्रवादी एक दिसून आले; मात्र शिवसेना वेगळी पडल्याचे दिसून आले. माघारीच्या वेळेस शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली. पण मतदान करताना महाविकास आघाडीच्या सोबत न जाता तटस्थाची भूमिका घेतली. महापौर निवडणुकीत एकही पक्षाचे मत फुटले नाही. त्यावरुनच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे राजकीय गणित चुकले आणि त्यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत फक्त विरोधाला विरोध म्हणून आपला उमेदवार उभा करुन निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही.

पण निवडणुकीच्या निकालानंतर हेही स्पष्ट झाले की, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षातील काही नेतेमंडळींनासुद्धा असाच निकाल पाहिजे होता. म्हणून त्यांनी फक्त बघ्याची भूमिका पार पाडत एकप्रकारे भाजपालाच सपोर्ट केला, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.