शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

काँग्रेस सत्तेत येताच महिलांना ५० टक्के आरक्षण देणार - राहुल गांधी

By अतुल जोशी | Updated: March 13, 2024 18:15 IST

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली होती. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आरक्षण देण्याची घोषणा केली. पण सर्व्हे केल्यानंतर दहा वर्षांनी महिलांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. मात्र काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास कुठलाही सर्व्हे न करता महिलांना ५० टक्के आरक्षण देईल अशी घोषणा काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी महिला परिषदेत केली. यावेळी त्यांनी महिलांना न्याय देण्यासाठी पाच महत्वपूर्ण घोषणा करीत आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजविला.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बुधवारी धुळ्यात आली होती. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला न्याय हक्क परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते. सुरत बायपासवरील एका हॉटेलच्या मैदानावर झालेल्या या परिषदेस काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, चंद्रकात हंडोरे, खासदार रजनी पाटील आदी उपस्थित होते.

केंद्र सरकार देशातील मोजक्या २०-२५ लोकांचे ऐकते, त्यांच्यासाठीच निर्णय घेते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही, गरीब महिला, मजूर यांचे कर्ज माफ न करता अदानीचे १६ लाख करोडचे कर्ज माफ केले. हा शेतकरी गरीब, मजुरांवर अन्यायच आहे. देशात ५० टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत. आदिवासी, दलित, शेतकरी, आजही विकासापासून वंचित आहे, याला विद्यमान केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम जाती गणना 

काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम जाती गणना केली जाईल. त्यामुळे या देशात आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, किती आहे ते समजण्यास मदत होईल. याचबरोबर देशातील सर्व संस्थाचे आर्थिक सर्वेक्षण केले जाईल. या सर्वेक्षणातून संस्थांमध्ये महिलांची भागीदारी किती आहे, ते समजण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसDhuleधुळे