शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

तब्बल दीड महिन्यांनंतर बरसल्या आनंदसरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:43 IST

धुळे/कापडणे : तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. या भिजपावसाने पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी ...

धुळे/कापडणे : तब्बल दीड महिन्यांच्या खंडानंतर मंगळवारी जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन झाले. या भिजपावसाने पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे वातावरण होते. काही भागांत रिपरीप सुरू होती. दुपारी ३ वाजल्यानंतर पावसाने जोर पकडला तो सायंकाळपर्यंत कायम होता. त्यानंतर देखील भिजपाऊस सुरुच होता.यंदाच्या खरीप हंगामात ४ आणि १७ जूनला रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दडी मारली. काही भागांत दुबार तर काही भागांत तिबार पेरणी करावी लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात काही ठिकाणी अधूनमधून पाऊस हजेरी लावत होता परंतु तो पिकांसाठी पुरेसा नव्हता. शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्याची परिस्थिती बिकट होती. पिके करपू लागली होती. त्यामुळे नैसर्गिक संकटात सापडलेला शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु मंगळवारच्या पावसाने पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. आनंदाचे वातावरण आहे. असे असले तरी दुबार पेरणीमुळे झालेले नुकसान भरून निघणार नाही शिवाय उत्पन्न किती मिळते हे पिके हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे. कापडणे गावासह जिल्ह्यांत इतरही गावांच्या शिवारात पाऊस झाला. ‘पंढाय’ लागल्याने शेतकरी सुखावला. खानदेशातील ग्रामदेवता कानबाई मातेचा सोमवारी विसर्जन सोहळा आटोपल्यानंतर मंगळवारी पावसाचे आगमन झाले; परंतु पाऊस उशिरा झाल्याने पिकांच्या एकूण उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपेक्षाही जास्त घट येणार असल्याचे शेतकरी सांगतात.

नेर शिवारात जोरदार पाऊस

नेर : गेल्या दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावून श्रावण महिन्यात शुभसंकेत दिले. यामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेरसह परिसरात गेल्या दीड महिन्यांपासून पाऊस लांबलेला होता. वारा आणि उन्हामुळे पिके करपू लागली होती. विहिरींची पातळी ही खोल गेली होती. कोरडवाहू शेतकरी हतबल होऊन आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पिके वाचविण्यासाठी अक्कलपाडा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरत होती. पाणीही सोडले गेले होते. सुदैवाने मंगळवारी चार वाजता अचानक वातावरण निर्माण होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास झालेल्या या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे श्रावण महिना सुरू असल्याने महिन्याभरात चांगला पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आता वाटू लागली आहे.

मालपूरसह शिंदखेडा तालुक्यात पावसाचे आगमन

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूरसह तालुक्यात मंगळवारी दुपारी तीन वाजता पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. पिके करपली होती. पशुधनासाठी चाऱ्याचादेखील प्रश्न गंभीर बनला असता; परंतु या संततधार पावसामुळे पिकांना तर जीवदान मिळालेच आहे शिवाय चाऱ्याचाही प्रश्न सुटणार आहे.