शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

स्वातंत्र्योत्तर काळानंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST

धुुळे : शिंदखेडा तालुक्यातील हातनुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना २३ मार्च १९५६ रोजी ...

धुुळे : शिंदखेडा तालुक्यातील हातनुर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. या ग्रामपंचायतीची स्थापना २३ मार्च १९५६ रोजी झाल्यापासून २०१५पर्यंत तब्बल ५९ वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या ग्रामपंचायतीवर तीन वर्ष भाजपची सत्ता होती.

१९५६ सालातील गावाच्या लोकसंख्येनुसार सुरुवातीला तीन प्रभागांतून ९ सदस्य निवडून येत होते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून सलग ३५ वर्ष दंगल राघो बागुल यांनी सरपंचपद भूषविले होते. त्यानंतर दगा बुधा पाटील, साहेबराव गोविंदा पाटील, भिवराज नंदराव बागुल, निंबा दयाराम निकम, प्रेमराज जयदेव महाले, पुजाबाई विश्वास निकम, बन्सीलाल जयदेव निकम, जयवंताबाई हिलाल पाटील, आशाबाई नारायण निकम, दीपक नारायण जगताप (प्रभारी) अशा ५९ वर्षांच्या कालखंडात काँग्रेस व त्यांनतर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता या ग्रामपंचायतीवर होती. त्यानंतर दंगल राघो बागुल यांचे सुपुत्र वाल्मिक बागुल यांनी भाजपत प्रवेश केल्याने राजकीय समिकरणात बदल होत गेला. त्यांनतरच्या दोन वर्षांसाठी २०१५ ते २०२०पर्यंत कल्पनाबाई अमृत पाटील या भाजपच्या सरपंच आहेत.

राजकारणात दुसरी पिढी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेत दंगल बागुल हे सुरुवातीचे ३५ वर्ष सरपंच होते. त्यांनतर त्यांची दुसरी पिढी राजकारणात आली आहे. वाल्मिक बागुल व पत्नी०००० बागुल यांनी २०१५ ते २०२०मध्ये ग्रामपंचायत सदस्य होते.

२५ वर्ष मराठ्यांच्या हाती सत्ता

१९९५ ते २०२०पर्यंत ग्रामपंचायतीवर काॅंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या कार्यकाळापर्यंत २५ वर्ष जगताप कुटुंबियांकडे उपसरपंचपद होते. सुरुवातीच्या काळात शेषराव भाेसले ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. त्यानंतर अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळाला, यासाठी पदकोर गिरासे यांना संधी देण्यात आली. त्यानंतर पुन्हा जगताप कुटुंबातून बाबुराव मराठे, खुशाल जगताप, दीपक जगताप असे आतापर्यंत उपसरपंच झालेले आहेत.

चार महिलांना सरपंचपदाचा मान

ग्रामपंचायतीच्या ६५ वर्षांच्या काळात पुजाबाई विश्वास निकम, जयवंताबाई हिलाल निकम, आशाबाई नारायण निकम व कल्पना अमृत निकम अशा चार महिला सरपंच होऊन गेल्या आहेत.

१३ जातींपैकी काही जाती राजकारणापासून दूरच

गावाची सुमारे सहा हजार लोकसंख्या आहे तर मतदारांची संख्या ३ हजार २०० आहे. त्यानुसार सध्या ११ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गावात १३ विविध जाती आहेत. त्यामध्ये पाटील, जगताप, आदिवासी, न्हावी, नगराळे अशा मुख्य पाच जातीमधील उमेदवारांना निवडणुकीत स्थान मिळालेले आहे. तर माळी, कोळी, वडार तसेच इतर पाटील समाजातील लहान बोरसे, आहिरे व अन्य जाती व पोटजातींना राजकीय वारसा नाही. त्यामुळे ६४ वर्षांत एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला नाही.

अल्पसंख्याक उमेेदवाराला सर्वाधिक मते

२०१५मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सर्वात्रिक निवडणुकीत प्रभाग १ मधून निवडणूक लढवलेले भगवान कुमावत ७०० मतांच्या प्रभागातून आतापर्यंत सर्वाधिक ४७० मते मिळवत निवडून आले आहेत. आतापर्यंत एकही निवडणूक बिनविराेध झालेली नाही. तसेच त्यासाठी प्रयत्नही करण्यात आलेला नाही.