शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
अलास्काला ६, तर इंडोनेशियाला ६.२ तीव्रतेच्या भूकंपाचे झटके; 400 वर घरे उद्ध्वस्त, 7000 हून अधिक विस्थापित 
4
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
5
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
6
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
7
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
8
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
9
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
10
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
11
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
12
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
13
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
14
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
15
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
16
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
17
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
18
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
19
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
20
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
Daily Top 2Weekly Top 5

लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 11:59 IST

साक्री तालुका : संततधार पावसामुळे बहुतांश धरणात १०० टक्के साठा, पिकांना मिळाले जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री/पिंपळनेर : गेल्या आठ दिवसांपासून संततधार पावसामुळे साक्री तालुक्यातील बहुतांश धरण १०० टक्के भरले असून लाटीपाडा धरणात ५० टक्के पाणी साठा झाला आहे. तसेच पावसामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून पिकांना जीवदान मिळाले आहे.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लाटीपाडा धरणाचा जलसाठा हा फक्त अर्धा ते एक टक्का एवढा होता. तसेच खरीप हंगामात पिकांची पेरणी झालेली असतांना पाऊस लांबल्याने शेतकºयांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतू गेल्या आठ दिवसांपासून संततधार पाऊस सुरु झाल्याने पिकांना मोठा आधार मिळाला आहे. तसेच लाटीपाडा धरण ५० टक्के भरले आहे. यंदा तीव्र उन्हाळा असल्याने पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तसेच नदीतही जेमतेमच पाणी होते. परंतू गेल्या आठ दिवसांपासून पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने पश्चिम पट्ट्यातील नदी-नाले पाण्याने भरुन ओसंडून वाहून निघाल्याने हे सर्व पाणी लाटीपाडा धरणात येत आहे. यामुळे धरणाची पाण्याची पातळी वाढली आहे. येणाºया काही दिवसांमध्ये याच प्रमाणात पाऊस आल्यास लवकरच लाटीपाडा धरण ओसंडून वाहून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पावसाचे योग्यवेळी आगमन झाल्याने खरीप हंगामातील शेतकºयांची पिकेही शेतांमध्ये हिरवीगार झाल्याचे पाहण्यास मिळत आहे तर दुबार पेरणीचे मोठे संकट दूर झाले आहे. पिंपळनेरच्या पश्चिम पट्टयात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने जोर कायम ठेवल्याने पांझरा नदी वाहून निघाली आहे. भात शेतीची रोपणी सुरुतसेच भात शेतीची रोपणी मोठया प्रमाणात सुरू आहे. यामुळे शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, तर शेतकरी बांधवांना लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहण्यासाठी तरी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.जलयुक्त बंधारे तुडूंबजलयुक्त शिवारअंतर्गत झालेले लहान-लहान बंधारे, तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मालपुर- कासारे दरम्यान असलेला बंधारा यावर्षी पूर्ण करण्यात आला आहे. या बंधाºयामुळे मोठया प्रमाणात पाणी अडविण्याची क्षमता निर्माण झाल्याने पाण्याचा फ्लो मोठया अंतरापर्यंत मागे गेला आहे. यामुळे मालपुर आणि कासारे ही दोन्ही गावे एखाद्या धरणाच्या काठावर वसलेली आहेत, असे नयनरम्य चित्र निर्माण झाले आहे. लघु सिंचन विभागाने बांधलेल्या या बंधाºयामुळे दोन्ही गावांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाने मोठी दडी मारली होती. यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहते कि काय, अशी भीती व्यक्त होत होती. परंतू वरुणराजाने कृपा केल्याने तालुक्यातील धरणे भरली असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे