शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील १५३ तलाव होणार गाळमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 11:54 IST

तलावांमधील साचलेला गाळ काढल्यास त्यांची पाण्याची क्षमता वाढणार

ठळक मुद्देगाळांमुळे पाणी साठवण क्षमता झाली होती कमीअनुलोम संस्थेतर्फे गाळ काढण्यात येणारपावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यात लघुसिंचन विभागांतर्गत असलेल्या गाव तलाव, पाझर तलाव, यांची संख्या बऱ्यापैकी आहे. मात्र यातील बहुतांश प्रकल्प हे गाळाने भरलेले आहेत. त्यामुळे चांगले पर्जन्यमान होऊनही प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे पाणीसाठा होत नाही. ही बाब निदर्शनास आल्यानंतर गाळमुक्त धरण, गावमुक्त शिवार योजना ही योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील १५३ तलावांमधील गाळ पावसाळ्यापूर्वी काढण्यास प्रशासकीय मान्यता दिल्याची माहिती जिल्हा परिषदेतील लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता जे.एन. पाटील यांनी दिली आहे.तलावांमधील साचलेला गाळ काढल्यास त्यांची पाण्याची क्षमता वाढणार आहे. जिल्ह्यातील गाव तलाव, पाझर तलाव हे जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागांतर्गत येत असतात. त्यांची देखरेखीची जबाबदारी याच विभागाची आहे. जिल्ह्यात असलेल्या पाझर तलाव, गाव तलावांमध्ये गाळ साचून राहिल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाले. त्यामुळे तलावात जमा झालेला गाळ काढून तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने गाळ मुक्त तलाव, गाळयुक्त शिवार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यात तलावातील गाळ काढून तो गाव शिवारातील शेतात टाकण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १५३ तलावातील गाळ काढण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यात धुळे तालुक्यातील ६०, शिरपूर तालुक्यातील १९, शिंदखेडा तालुक्यातील ४२ व साक्री तालुक्यातील ३२ गाव तलाव, पाझर तलावातील गाळ काढण्यात येणार आहे.तलावातील गाळ काढण्याची जबाबदारी अनुलोम संस्थेकडे आहे. त्यांचा शासनाशी करार झालेला आहे असे सांगण्यात आले.अनुलोम संस्थेने जिल्ह्यातील तलावाचे सर्वेक्षण केले. त्यातून संस्थेला जिल्ह्यातील तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आढळून आला. त्यामुळे अनुलोम संस्थेने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारया अभियानांतर्गत तलावातील साचलेला गाळ बाहेर काढण्यास सुरूवात केलेली आहे. गाळ काढण्यासाठी संस्थेचे जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिलेली आहेत. तलावातून काढलेला गाळ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. शेतकºयांनी हा गाळ शेतात टाकल्यास जमीनीची सुपिकता वाढण्यास मदत होणार आहे.या संस्थेला गाळ काढण्यासाठी ११ रूपये ९२ पैसे प्रति घनमीटरप्रमाणे काम देण्यात आले आहे असेही सांगण्यात आले. 

टॅग्स :Dhuleधुळे