शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

१०० रिक्षाधारकांना मिळणार लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:36 IST

राज्यात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे़ ती लागू करतांना ...

राज्यात रुग्णांची संख्या वाढू लागल्याने अखेरचा पर्याय म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे़ ती लागू करतांना अनेक निर्बंध लागू केले आहेत़ ते करीत असतांना गोरगरीब, हातावरील पोट असणाऱ्यांसाठी देखील राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे़ त्यानुसार परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपये देण्याचे शासनाने घोषित केले आहे़ याचा लाभ आता केव्हा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे़ प्रत्यक्षात या तालुक्यात ४०० रिक्षाचालक असतांना परवानाधारक १०० पर्यंत आहे़ त्यानुसार आता या रिक्षा चालकांना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे़ परंतु प्रत्यक्षात तो केव्हा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे़ असे असले तरी सध्याच्या महागाई इतकी आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़ त्यामुळे राज्य शासनाकडून मिळणारी ही मदत किती पुरणार असा सवाल रिक्षा चालकांनी केला आहे़

राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार तालुक्यातील रिक्षाचालकांना १ हजार ५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे, परंतु ही मदत खूपच तुटपुंजी असल्याची प्रतिक्रिया रिक्षा चालकांनी व्यक्त केली़ शासनाचे नियम व अटींमुळे केवळ बोटावर मोजण्याएवढे सुध्दा रिक्षा चालकांना ही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे शासनाच्या या घोषणेमुळे रिक्षाचालकांना काहीच फरक पडणार नाही़

शिरपूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्यामुळे शासनाने ब्रेक दि चेनमधील निर्बंधांची अंमलबजावणी बुधवारी रात्रीपासून सर्वत्र सुरू केली़ या पार्श्वभूमीवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली जाणार आहे़

शहरात रिक्षा चालकांची संख्या जवळपास ४०० पर्यंत असली तरी परवानाधारकांची संख्या १०० पर्यंत आहे़ दर ३ ते ५ वर्षांनी रिक्षाचे परमिट सोबत दरवर्षी वाहनाचा विमा, पासिंग व इतर टॅक्स खर्च १४ हजारांपर्यंत येत असतो़ गेल्या वर्षापासून लॉकडाऊन, संचारबंदी आणि कोरोनाच्या भीतीमुळे प्रवाशी देखील बाहेरगांवी पडत नसल्यामुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय होत नाही़ बहुतेक वेळा काही रिक्षा चालकांना ग्राहकच मिळत नसल्यामुळे पैसा देखील मिळत नसल्याची परिस्थिती आहे़ त्यामुळे त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालत असेल याची विचारणा न केलेली बरी़

राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार आता रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. मात्र शासनाच्या नियम व अटींमुळे बोटावर एवढे रिक्षा चालकांना सुध्दा ही मदत मिळणार नसल्याचे सांगण्यात आले़ त्यामुळे शासनाने सरसकट ही मदत दिली तरच रिक्षा चालकांना लाभ होणार आहे़

शिरपूर तालुक्यातील परवानाधारक रिक्षाचालकांची संख्या- १००

रिक्षाचालकांची प्रतिक्रिया

सरकारच्या नवीन घोषणेबाबत रिक्षाचालकांनी स्वागतच केले आहे़ मात्र शासनाने ती मदत सरसकट द्यावी़ नियम व अटी टाकू नये़ बोटावरच रिक्षा चालकांना ही मदत मिळू शकणार आहे़

- मोहन दिलीप येशी,

रिक्षा चालक

मागील वर्ष पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये गेले, त्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाही़ त्यात आता पुन्हा लॉकडाऊन झाला आहे़ त्यातही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा दिली आहे़ त्यामुळे रिक्षा सुरू जरी राहिल्या तरी त्याचा फायदा आम्हाला काय होणाऱ

- दत्तू माळी,

अध्यक्ष, रिक्षा चालक युनियन संघटना शिरपूर

रिक्षा चालवतो तेव्हा आमचे घर चालते़ मागील वर्षी देखील लॉकडाऊन झाला तेव्हा महागाईने आग ओकली होती़ आता पुन्हा महागाई वाढत आहे़ त्यामुळे शासनाकडून मिळणाºया या तुटपुंज्या पैशात घर कसे चालवायचे असा प्रश्न पडला आहे़

- क

रिक्षा चालक