शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

‘राेहयाे’ कक्षाची कासवगती; सिंचन विहिरींच्या हजारावर प्रस्तावांवर साचली धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 16:55 IST

शेतकऱ्याची गरज ओळखून वैयक्तिक लाभाच्या याेजनेत सिंचन विहिरींचाही समावेश करण्यात आला.

ठळक मुद्देकाही संचिका २०१८ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत

उस्मानाबाद : सिंचनाची कायमस्वरूपी सुविधा निर्माण व्हावी, यासाठी राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरी घेण्यास मंजुरी देण्यात आली. एक-दाेन वर्षांआड पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचाही या याेजनेकडे कल वाढला आहे; परंतु ‘राेहयाे’ कक्षाच्या कासवगतीमुळे सुमारे १ हजारापेक्षा अधिक प्रस्तावांवर धूळ साचली आहे. यातील काही प्रस्ताव तर तब्बल २०१८ पासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.

राेजगार हमी याेजनेतून वैयक्तिक लाभाच्या याेजनाही देण्यात येतात. शेतकऱ्याची गरज ओळखून वैयक्तिक लाभाच्या याेजनेत सिंचन विहिरींचाही समावेश करण्यात आला. शेतकऱ्यांचाही चांगला प्रतिसाद लाभ आहे. प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव येत आहेत; परंतु वेळेवर मंजुरी मिळत नसल्याने अपेक्षेवर पाणी फेरले जात आहे. जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे २०१८ पासून आलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रस्तावांना मंजुरी मिळावी, यासाठी संबंधित शेतकरी कधी पंचायत समिती तर कधी राेहयाे कक्षाला खेटे मारीत आहेत; परंतु येथील अधिकारी, कर्मचारी सुरुवातीला पाच अपूर्ण कामे पुढे करून त्यांना आल्या पावली परत पाठवीत हाेते. यानंतर २८ ऑगस्ट २०२० मध्ये शासनाने ही अट रद्द करून त्या-त्या गावच्या लाेकसंख्येनुसार विहिरींना मंजुरी देण्यात यावी, असे सुधारित आदेश काढले. त्यामुळे प्रस्ताव तातडीने मार्गी लागतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा हाेती; परंतु तसे झाले नाही. मध्यंतरीच्या काळात काेराेना आला. या संकटाचा दाखला देत पुन्हा संचिकांवरील धुळीचे थर साचले. काेराेनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर निवडणूक आचारसंहिता लागली. त्यामुळे पुन्हा प्रक्रिया ठप्प झाली. परिणामी, आजघडीला जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे सुमारे एक हजारापेक्षा अधिक प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. प्रस्तावांना मंजुरी देण्याची गती अशीच राहिल्यास शेतकरी सिंचन विहिरी कधी खाेदणार, असा प्रश्न उपस्थित हाेऊ लागला आहे.

साडेतीनशे प्रस्ताव ‘स्वाक्षरी’साठी...शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटू लागल्यानंतर राेहयाे कक्षाने सुमारे साडेतीनशे प्रस्ताव तयार केले आहेत. स्वाक्षरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यांची स्वाक्षरी हाेताच विहिरींची कामे हाती घेण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे. त्यामुळे सीईओ कधी स्वाक्षरी करतात? याकडे प्रस्तावधारक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

एकट्या परंड्याच्या ७०० प्रस्ताव...एकट्या परंडा तालुक्यातील थाेडेथाेडके नव्हे तर सातशे प्रस्ताव जिल्हा परिषद राेहयाे कक्षाकडे दाखल झाले आहेत. यातील बहुतांश प्रस्ताव ५ अपूर्ण कामांच्या अटीमुळे लटकले हाेते; परंतु ही अटच रद्द झाल्याने हा प्रश्न मार्गी लागला आहे. असे असतानाही यातील एकाही प्रस्तावाला आजवर मंजुरी मिळालेली नाही. ५० प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अशी आहे प्रक्रिया...ग्रापंकडून विहिरीचे प्रस्ताव पंसकडे दाखल केले जातात. तेथे महाग्रारोहयो कक्षात त्याची छाननी होते. यानंतर पंसमध्ये सहायक गट विकास अधिकारी, वरिष्ठ लिपिक, विस्तार अधिकारी असा प्रवास करत संचिका महाग्रारोहयो कक्षात परत येते. यानंतर तांत्रिक मान्यतेसाठी लघु पाटबंधारे उपविभागाकडे पाठवली जाते. याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागाची वारीही घडते. हा सर्व सोपस्कार पार पाडत गटविकास अधिकारी यांच्या दालनात काही दिवस मुक्काम करत ही संचिका जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी (महाग्रारोहयो) कक्षात दाखल होते. याठिकाणी पुन्हा अटी व निकषांच्या कचाट्यातून तपासणी होत पुढे प्रशासकीय मान्यतेसाठी विहिरीच्या संचिकेचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे प्रवास सुरू होतो. तेथे प्रशासकीय मान्यता देण्यात येते. ती मिळाल्यानंतर प्रमाचे आदेश परत याच टप्प्याने तालुकास्तरावर पंसकडे पोहोचतात.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र