शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

चार वर्षांपासून पुलाचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST

(फोटो : देवीसिंग राजपूत १७) येणेगूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील पुलाचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले असून, या ...

(फोटो : देवीसिंग राजपूत १७)

येणेगूर : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील पुलाचे बांधकाम मागील चार वर्षांपासून रखडले असून, या बांधकामासाठी आणलेले सिमेंटचे पाईप येणेगूर-दावलमलीकवाडी रस्त्यावर धूळखात पडले आहेत. त्यामुळे हे काम त्वरित मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.

साडेचार कोटीच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून येणेगूर-दावलमलीकवाडी-सुपतगाव-कोराळ ते शास्त्रीनगर तांडा या गावांना जोडण्यासाठी जिल्हा विशेष कार्यकारी अभियंता कार्यालयाकडून डांबरीकरण करण्यात आले होते. याला चार वर्षे लोटली. यानंतर येणेगूर पासून अर्ध्या किमी अंतरावरील कोराळ विहिरी नजीक असलेल्या पुलासाठी हे तीन सिमेंट नळकांडे आणण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे या फरशी पुलाचे बांधकाम राहून गेले. संबंधित खात्याच्या कनिष्ठ अभियंत्याने शर्थीचे प्रयत्न करून त्या अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेतकऱ्यांनी आपला हट्ट न सोडल्याने हे काम आजवर मार्गी लागू शकले नाही. त्यामुळे हे तीनही नळकांडे तब्बल चार वर्षांपासून धूळखात पडले आहेत. संबंधित विभागाने या पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.