शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठीची सेवा करणाऱ्या दिब्रिटोंना विरोध कशासाठी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 04:29 IST

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू नका अशा आशयाचा फोन ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना आला होता.

- स्नेहा मोरे 

संत गोरोबाकाका साहित्यनगरी (उस्मानाबाद) : ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उपस्थित राहू नका अशा आशयाचा फोन ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना आला होता. मात्र, निडरपणे महानोर यांनी शुक्रवारी संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थिती दर्शविली.ते म्हणाले, संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठीची सेवा केली आहे़ माझे त्यांना समर्थन आहे़ त्यांना विरोध कशासाठी, असे ठणकावून सांगत मंचावर महानोरच उभे आहेत, माझं भूत नाही, असा टोलाही लगावला. संमेलनाध्यक्ष दिब्रिटो यांच्याविषयी झालेल्या वादाचा खरपूस समाचार घेत मराठी साहित्य क्षेत्रातील दिब्रिटो यांचे योगदान महानोरांनी विस्ताराने अधोरेखित केले. ते म्हणाले, साहित्यिकाला कोणताही जात-धर्म नसतो. उच्च साहित्य हीच साहित्यिकाची जात असते. त्यामुळे मराठी भाषा साहित्यासाठी दिब्रिटो करत असलेले काम हे जाती-धर्माच्या पलीकडे आहे. यावेळी महानोर यांनी मराठवाड्याने घडविलेल्या साहित्यिकांच्या प्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा साहित्य अकादमीचा पुरस्कार गेल्या आठ वर्षात मराठवाड्यातील तीन साहित्यिकांना मिळाला याचा अभिमान आहे. साहित्य-कला क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिभावान मंडळी औरंगाबाद आणि मराठवाड्यातील असल्याचेही त्यांनी नमूद केले. आगामी नाट्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल हे सुद्धा मराठवाड्याचे पुत्र असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.साहित्यिकांच्या मंचावर राजकारणी असावेत का, यावर ते म्हणाले, यशवंतराव चव्हाणांनी समोरच्या रांगेत बसून, रसिक म्हणून संमेलनास हजेरी लावली आहे़ ही आपली परंपरा आहे़ त्याची प्रचिती आज येथे येत आहे़ दरम्यान, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही महानोर यांनी मांडला़ घरातील पुस्तकांचे कपाट म्हणजे दुसरे देवघर असते, असेही ते म्हणाले़

हे तर पुरोगामी महाराष्ट्राचे अपयशअभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या होणाºया गळचेपीवर भाष्य करताना महानोर म्हणाले, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा उलगडा अजूनही झालेला नाही, हा शोध जलद गतीने व्हावा यासाठी आग्रही असणाºया व्यक्तींना यंत्रणा देशद्रोही ठरवते हा महाराष्ट्राचा करंटेपणा आहे. अभिव्यक्त होत असलेली माणसं अशी जात असतील तर हे पुरोगामी महाराष्ट्राचे अपयश आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन