शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

भरपाईच्या प्रतीक्षेत अख्खे वर्ष लोटले...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

तुळजापूर : गतवर्षी खरिपात न उगवलेल्या विविध कंपन्यांची सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. यामुळे मदतीसाठी कृषी विभागाकडे ...

तुळजापूर : गतवर्षी खरिपात न उगवलेल्या विविध कंपन्यांची सोयाबीन बियाणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. यामुळे मदतीसाठी कृषी विभागाकडे एक-दोन नव्हे, तर तब्बल २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यांची तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र, खरिपाचा दुसरा हंगाम आला, तरी या शेतकऱ्यांना ना प्रशासनाने मदत केली ना कंपनीने. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गतवर्षी जूनच्या सुरुवातीपासूनच तुळजापूर तालुक्‍यात दमदार पाऊस झाला. कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी संकटातून सावत पेरणी योग्य पाऊस झाल्याने, उसनवारी, सावकाराकडून कर्ज काढून एकरी जवळपास १५ ते २० हजार रुपये खर्च करून, विविध नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणाची पेरणी केली, परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे उगवले नाही. यामुळे शेतकरी हतबल झाले होते. बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीची वेळ ओढावल्यानंतर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी बोगस बियाणांबाबत कृषी विभागाच्या तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली.

तुळजापूर तालुक्यातून तब्बल २ हजार ५१८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे पहिल्या व दुसऱ्या पेरणीचा खर्च शासनाकडून अथवा संबंधित कंपनीकडून मिळेल, या आशेने तक्रारी दाखल केल्या. यानुसार कृषी विभागाच्या तालुकास्तरिय समितीने पंचनामेही केले. यामध्ये जवळपास २६३४.९८ हेक्टर क्षेत्रातील विविध नामांकित कंपनीचे १९७६.९८५ क्विंटल सोयबीन बियाणे उगवले नसल्याचे तालुकास्तरिय समितीच्या अहवालातून पुढे आले होते.

यावरून तालुका कृषी विभागाने बन्सल सिड्स, महाबीज, दादाजी सीड्स, वृंदावन यासह आणखी एका अशा एकूण ५ कंपन्यावर न्यायालयात खटले दाखल केले होते, तसेच पंचायत समिती कृषी विभागाने ८ कंपन्यावर न्यायालयात तर वरदान कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यालाही आता एक वर्षाचा कालावधी लोटत आला असून, अद्याप या शेतकऱ्यांना प्रशासन अथवा संबंधित कंपनीकडून कसलीही मदत मिळालेली नाही.

कोट..........

काही कंपन्यांनी आमच्या परस्पर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. त्याची माहिती आमच्याकडे नाही, महाबीज कंपनी ही शासनाची अधिकृत कंपनी आहे. या कंपनीने काही लॉट निवडून ज्या लॉटचे नुकसान झाले आहे, त्यांना थेट भरपाई दिली आहे. पाच बोगस बियाणे कंपन्यावर न्यायलयात खटले दाखल केले असून, या वर्षी शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. यावेळी बियाणे पेरते वेळी, पेरल्यानंतर यातील मूठभर बियाणे उगवण होईपर्यंत जपून ठेवावे. कोणाची काहीही तक्रार असेल, तर भरारी पथकाकडे दाखल करावी.

- एन.टी. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी

गतवर्षी खरिपात महाबीज कंपनीचे बियाणे पेरले होते. यातील एकही बॅग उगवून आली नसल्याने कृषी विभागाकडे लेखी तक्रार दिली, परंतु खरिपाचा दुसरा हंगाम येत आला, तरी अद्याप कसलीच भरपाई मिळालेली नाही. महाबीजसह अन्य कंपनीविरुद्ध अनेक शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु यातील बहुतांशी शेतकऱ्यांना एक रुपयांचीही मदत मिळालेली नाही.

- धन्यकुमार कुलकर्णी, शेतकरी, तडवळा