शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
2
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
3
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
4
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
5
भारतीय 'सबीह खान' यांची Apple मध्ये जादू! २३४ कोटींचे वार्षिक पॅकेज; कुठे झालंय शिक्षण?
6
भारताला जागतिक धक्का! १० शक्तिशाली देशांच्या यादीतून नाव गायब; रँकिंगमध्ये देश कितव्या स्थानी?
7
कारचा चक्काचूर, कोल्हापूर अँटी करप्शनच्या DYSP वैष्णवी पाटलांना अपघात; दोघे जागीच दगावले
8
२५ वर्षे सत्ता, पण मूलभूत प्रश्न सुटले नाही?; शिंदेसेनेचे उत्तर, विरोधकांना आयतीच संधी, नेते म्हणाले…
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना शुभ-फलदायी, पैशांचा ओघ राहील; ४ राशींना संघर्ष, संमिश्र काळ!
10
पात्र, अपात्र धारावीकरांना धारावीतच घर; पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार: मुख्यमंत्री फडणवीस
11
आजचे राशीभविष्य : रविवार ११ जानेवारी २०२६; आर्थिक लाभ आणि प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आपण खुश व्हाल, अचानक नशिबाची साथ मिळेल 
12
"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
13
हिस्ट्री शीटर ते थेट निवडणुकीच्या रिंगणात; अंगावर २५ गुन्हे असलेल्या सज्जू मलिकला राष्ट्रवादीकडून उमेदवारी
14
दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ
15
भाजपने विकास केला म्हणून 'ते' वैतागले आहेत; मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
16
'अहमदाबादचे नामांतर करण्याची हिंमत दाखवा'; अमित शाहांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचे आव्हान
17
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
18
महापालिका रणांगणात मनसेची 'नवी फळी'; २६ उमेदवार कोट्यवधी संपत्तीचे मालक
19
पास घरी राहिला म्हणून चिमुकल्याला कंडक्टरने एसटीतून हायवेवर उतरवले!
20
Rishabh Pant Has Been Ruled Out : रिषभ पंतची न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा ...

उस्मानाबाद : यंदा खरीप हंगामात पीक विम्यासाठी मुदत वाढवून दिल्यानंतर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पीक विमा भरल्यानंतर मदत मिळविण्यासाठी लावण्यात येणारे निकष आडकाठी बनत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरविली आहे. मदत मिळत नसले तर कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

गतवर्षी सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळण्याची आवश्यकता होती. परंतु बहुतांश जणांना मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना २३ जुलै २०२१ पर्यंत मुदत दिली होती. यापुढे सरकारच्या वतीने मुदत वाढविल्यास पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते. त्या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांमध्ये प्रभावी जनजागृती होणे आवश्यक आहे.

३० टक्के शेतकऱ्यांची पाठ

गतवर्षी जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांचा विमा काढला.

नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून पुरेशी भरपाई मिळाली नाही.

सतत हीच स्थिती असूनही मदत मिळत नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नाही.

यंदा ७० टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. ३० टक्के शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

पॉईंटर..

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

४५००००

पीकविमा काढलेले शेतकरी

गतवर्षी ९४८०००

यंदा ६६७०००

एकूण खरीप क्षेत्र ५१४०.९३

सोयाबीन ३६३१.२३

मूग १८९.०३

उडीद ४९५.१८

मका १०.७९

कापूस २९.९६

तूर ६०१.९१

पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकाला विमा देण्याची तरतूद आहे. मात्र कंपन्याच्या जाचक अटीमुळे भरपाईची रक्कम फार कमी आहे. पीक लागवडीचा खर्च गेल्या दोन वर्षात प्रंचड वाढला आहे. त्यातल्या त्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान होत आहे. गतवर्षी चार एकर क्षेत्रावरील तूर व सोयाबीनचा विमा काढला होता. पूर्ण पीक वाया गेले. विमा केवळ १६ हजार रुपये मिळाला. नुकसानीच्या प्रमाणात विम्याचा लाभ मिळावा.

बन्सी पवार, शेतकरी, किलज

गतवर्षी अडीच एकर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड केली होती. या पिकाचा विमा भरला होता. पीक चांगले आले असतानाच काढणीच्या वेळी पाऊस आल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. केवळ १४ हजार रुपयांचा विमा मिळाला. गतवर्षीचा अनुभव वाईट आलेल्या आहे. यंदाही विमा काढला सोयाबीन पिकाचा विमा काढला आहे. कंपनीने नुकसान झालेल्या प्रमाणात भरपाई द्यावी.

राम रोकडे, शेतकरी, कुंभारी