शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिंदे-फडणवीसांनी राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

By बाबुराव चव्हाण | Updated: May 11, 2023 17:33 IST

सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले.

धाराशिव - आपल्या पक्षाचे आमदार साेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर कायदेशीर मार्गाने आमचे सरकार अस्तित्वात आले. सर्वाेच्च न्यायालयानेही गुरूवारी त्यावर शिक्कामाेर्तब केले. त्यामुळे आमच्या सरकारने राजीनामा देण्याचा प्रश्न येताेच कुठे? अशा शब्दात भाजपाचे प्रदेधाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विराेधकांवर घणाघात केला. तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे त्यांनी स्वागत केले.

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी जिल्हा दाैर्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्यासमवेत भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार सुजीतसिंह ठाकूर हेही उपस्थित हाेते. बावनकुळे म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर त्यांच्यास शिवसेना पक्षातील आमदारांनी अविश्वास दाखविला. आपलेच आमदार आपल्यासाेबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर स्वत: ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्याच्या हिताच्या दृष्टिकाेनातून हे पद फारकाळ रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबींचे पालन करून आमचं शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले. कायदेशीर मार्गाने आलेल्या या सरकारवर विराेधक नेहमी ‘खाेके सरकार’ म्हणून टिका करीत हाेते. एवढेच नाही तर आमच्या सरकारच्या विराेधात उध्दव ठाकरे सर्वाेच्च न्यायालयात गेले हाेते. या सत्तासंघर्षावर गुरूवारी सर्वाेच्च न्यायालयाने आपला महत्वपूर्ण निकाल दिला. निकालात निरीक्षणे काहीही नाेंदविली असली तरी एकनाथ शिंदे हे कायदेशीर पद्धतीनेच मुख्यमंत्री झाले आहेत, यावर शिक्कामाेर्तब केल्याचे सांगत न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसOsmanabadउस्मानाबाद