शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:36 IST

वक्त्यांचा सूर । साहित्यिकांनी वाचन भूक ओळखावी

स्नेहा मोरेसेतुमाधवराव पगडी साहित्य मंच (उस्मानाबाद) : मागच्या काही काळात संदर्भमूल्य असलेले साहित्य निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. याखेरीज ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करताना साहित्यिकांनी आपले आत्मचिंतन केले पाहिजे. त्याचप्रमाणे, एकविसाव्या शतकातील लिखाणाचा आढावा घेतानाच साहित्यिकांनी वाचकांची वाचन भूक ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम शिधये यांनी केले.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

शिधये म्हणाले, मागील काही काळात ज्या पुस्तकांकडे आपण आपोआप ओढले जात आहोत, त्याचे नेमके कारण काय, याचे विश्लेषण केले पाहिजे. सध्याच्या वाचकाची वाचन भूक काय आहे, हे साहित्यिकांनी ओळखले पाहिजे.

या विषयाची मांडणी करताना डॉ. दत्ता घोलप म्हणाले, कादंबरीच्या विश्वात मागच्या दशकात अधिक वास्तविकता डोकावू लागली आहे. नवी शैली, नवी भाषा आणि नवी धाटणी या रुपात कादंबरी लेखन वाचकांच्या भेटीला येत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कथेविषयी विशद करताना डॉ. केशव तुपे म्हणाले, कथा लेखनाला वेगळी परंपरा आहे. परंतु, मागच्या ५० वर्षात ही खंडित झाली आहे. कथा लिखाण हे वंचिताचे वंशज आहे. मागच्या काही काळात प्रणव सखदेव, जयंत पवार, बालाजी सुतार यांनी वेगळ्या धाटणीचे लिखाण केले आहे. आपण सर्व साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आल्याने निसर्गलिखाण काहीसे कथाप्रकारात दुर्लक्षित राहिले.लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोकावाचन संस्कृती लयाला जातेय अशी ओरड होत असताना दुसरीकडे उदंड साहित्याची निर्मिती होते आहे. मात्र, साहित्य लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका निर्माण झाला आहे. - प्रा. संतोष गोनबरेसमीक्षकांची पुरेशी संख्या नाही ही दुबळी बाजूज्यांनी सौंदयार्वादी कविता लिहिली, त्यांनी पुढे वास्तववादी लिखाण केले आहे. हा बदल आश्वासक आणि आव्हानात्मक आहे. कवींची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला समीक्षकांची संख्या पुरेशी नाही ही दुबळी बाजू आहे. - डॉ. पी. विठ्ठल

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन