शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:36 IST

वक्त्यांचा सूर । साहित्यिकांनी वाचन भूक ओळखावी

स्नेहा मोरेसेतुमाधवराव पगडी साहित्य मंच (उस्मानाबाद) : मागच्या काही काळात संदर्भमूल्य असलेले साहित्य निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. याखेरीज ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करताना साहित्यिकांनी आपले आत्मचिंतन केले पाहिजे. त्याचप्रमाणे, एकविसाव्या शतकातील लिखाणाचा आढावा घेतानाच साहित्यिकांनी वाचकांची वाचन भूक ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम शिधये यांनी केले.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

शिधये म्हणाले, मागील काही काळात ज्या पुस्तकांकडे आपण आपोआप ओढले जात आहोत, त्याचे नेमके कारण काय, याचे विश्लेषण केले पाहिजे. सध्याच्या वाचकाची वाचन भूक काय आहे, हे साहित्यिकांनी ओळखले पाहिजे.

या विषयाची मांडणी करताना डॉ. दत्ता घोलप म्हणाले, कादंबरीच्या विश्वात मागच्या दशकात अधिक वास्तविकता डोकावू लागली आहे. नवी शैली, नवी भाषा आणि नवी धाटणी या रुपात कादंबरी लेखन वाचकांच्या भेटीला येत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कथेविषयी विशद करताना डॉ. केशव तुपे म्हणाले, कथा लेखनाला वेगळी परंपरा आहे. परंतु, मागच्या ५० वर्षात ही खंडित झाली आहे. कथा लिखाण हे वंचिताचे वंशज आहे. मागच्या काही काळात प्रणव सखदेव, जयंत पवार, बालाजी सुतार यांनी वेगळ्या धाटणीचे लिखाण केले आहे. आपण सर्व साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आल्याने निसर्गलिखाण काहीसे कथाप्रकारात दुर्लक्षित राहिले.लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोकावाचन संस्कृती लयाला जातेय अशी ओरड होत असताना दुसरीकडे उदंड साहित्याची निर्मिती होते आहे. मात्र, साहित्य लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका निर्माण झाला आहे. - प्रा. संतोष गोनबरेसमीक्षकांची पुरेशी संख्या नाही ही दुबळी बाजूज्यांनी सौंदयार्वादी कविता लिहिली, त्यांनी पुढे वास्तववादी लिखाण केले आहे. हा बदल आश्वासक आणि आव्हानात्मक आहे. कवींची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला समीक्षकांची संख्या पुरेशी नाही ही दुबळी बाजू आहे. - डॉ. पी. विठ्ठल

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन