शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:36 IST

वक्त्यांचा सूर । साहित्यिकांनी वाचन भूक ओळखावी

स्नेहा मोरेसेतुमाधवराव पगडी साहित्य मंच (उस्मानाबाद) : मागच्या काही काळात संदर्भमूल्य असलेले साहित्य निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे. याखेरीज ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करताना साहित्यिकांनी आपले आत्मचिंतन केले पाहिजे. त्याचप्रमाणे, एकविसाव्या शतकातील लिखाणाचा आढावा घेतानाच साहित्यिकांनी वाचकांची वाचन भूक ओळखावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम शिधये यांनी केले.

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘एकविसाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या मराठी साहित्यात वाचण्यासारखे काय आहे?’ या विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.

शिधये म्हणाले, मागील काही काळात ज्या पुस्तकांकडे आपण आपोआप ओढले जात आहोत, त्याचे नेमके कारण काय, याचे विश्लेषण केले पाहिजे. सध्याच्या वाचकाची वाचन भूक काय आहे, हे साहित्यिकांनी ओळखले पाहिजे.

या विषयाची मांडणी करताना डॉ. दत्ता घोलप म्हणाले, कादंबरीच्या विश्वात मागच्या दशकात अधिक वास्तविकता डोकावू लागली आहे. नवी शैली, नवी भाषा आणि नवी धाटणी या रुपात कादंबरी लेखन वाचकांच्या भेटीला येत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. कथेविषयी विशद करताना डॉ. केशव तुपे म्हणाले, कथा लेखनाला वेगळी परंपरा आहे. परंतु, मागच्या ५० वर्षात ही खंडित झाली आहे. कथा लिखाण हे वंचिताचे वंशज आहे. मागच्या काही काळात प्रणव सखदेव, जयंत पवार, बालाजी सुतार यांनी वेगळ्या धाटणीचे लिखाण केले आहे. आपण सर्व साहित्याच्या केंद्रस्थानी माणूस आल्याने निसर्गलिखाण काहीसे कथाप्रकारात दुर्लक्षित राहिले.लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोकावाचन संस्कृती लयाला जातेय अशी ओरड होत असताना दुसरीकडे उदंड साहित्याची निर्मिती होते आहे. मात्र, साहित्य लिखाणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धोका निर्माण झाला आहे. - प्रा. संतोष गोनबरेसमीक्षकांची पुरेशी संख्या नाही ही दुबळी बाजूज्यांनी सौंदयार्वादी कविता लिहिली, त्यांनी पुढे वास्तववादी लिखाण केले आहे. हा बदल आश्वासक आणि आव्हानात्मक आहे. कवींची संख्या वाढत असली तरी दुसऱ्या बाजूला समीक्षकांची संख्या पुरेशी नाही ही दुबळी बाजू आहे. - डॉ. पी. विठ्ठल

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन