शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

‘आदर्श भाटशिरपुरा’साठी सर्व ताकदीनिशी सोबत राहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम केले असून, यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे व कष्टाचे ...

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा ग्रामस्थांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत जलसंवर्धनाचे उत्कृष्ट काम केले असून, यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे व कष्टाचे कौतुक करत भाटशिरपुरा हे आदर्श गाव करण्यासाठी पूर्ण ताकतीने ग्रामस्थांसोबत आहे, अशी ग्वाही आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. भाटशिरपुरा येथे श्रीकृष्ण मंदिरासमोरील सभागृह बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी शेतकऱ्यांच्या घरात पैसे येणे आवश्यक असून, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, छोटे व्यावसायिक व कामगारांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा आवर्जून उल्लेख करत प्रधानमंत्री स्वनिधी योजना, ई-मुद्रा, किसान क्रेडिट कार्ड, आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून देण्यात येत असलेल्या अर्थसहाय्य व सवलतीचा उल्लेख केला. खरीप २०२० मधील पीकविम्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरु आहे. यात नक्कीच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जि. प. अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, बाजार समिती सभापती रामहरी शिंदे, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर, तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संजय पाटील, पंडितराव टेकाळे, सुरेश कोरे, अनिल टेकाळे, उत्तम टेकाळे, दत्तात्रय साळुंके, भागचंद बागरेचा, अरुण चौधरी, बजरंग शिंदे, आर. के कोल्हे, प्रणव चव्हाण, नागनाथ घुले, शिवाजीराव गिड्डे, संजय अडसूळ, सरपंच सुनीता वाघमारे, उपसरपंच मेजर सूर्यकांत खापे, शिवराज गायकवाड, रामचंद्र खापे, उमेश रितपुरे, चेअरमन अंकुश गायकवाड, दिलीप वाघमारे, अशोक गायकवाड, रमेश रितपुरे, जनक गायकवाड, विजय गायकवाड, श्रीहरी रितपुरे, अशोक खापे, रामराव पाटील आदी उपस्थित होते.