शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

'जबाब दो मोदी जबाब दो...'; केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

By सूरज पाचपिंडे  | Updated: April 17, 2023 16:45 IST

जबाब दो मोदी जबाब दो... च्या घोषणांनी दणाणला परिसर

धाराशिव : भाजपचे वरिष्ठ नेते माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरसंदर्भात केलेल्या आरोपानंतर काँग्रेस पक्ष केंद्र सरकारच्या विरोधात आक्रमक झाला आहे. सोमवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाकचेरीसमोर आंदोलन करून केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो मोदी जबाब दो... आंदोलन करण्यात आले. ठरवून हत्याकांड करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, पुलवामा हत्याकांडात शहीद झालेल्या जवानांना न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गप्प राहण्यास का सांगण्यात आले? भारतीय जवानांना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली? पुलवामा घटनेत वापरण्यात आलेले ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? गुप्तचर यंत्रणांनी वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष का केले गेले? सत्यपाल मलिक यांना आरएसएसचे महासचिव राम माधव यांनी ३०० कोटींची ऑफर दिली, यावर कारवाई केली जाणार का नाही, असे सवाल आंदोलनकर्त्यांनी केले. यावेळी आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील, अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, खलील सय्यद, राजाभाऊ शेरखाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcongressकाँग्रेसprime ministerपंतप्रधान