शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

चाळी नामशेष होण्याच्या मार्गावर, शहरातील भाडेकरूंची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 05:51 IST

गावागावांचे मिळून शहर, शहराची कामगारनगरी त्यानंतर उद्योगनगरी- औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास येताना पिंपरी-चिंचवड महानगर झाले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे या महानगरातील झगमगाट वाढला आणि आर्थिक चक्रे झपाट्याने फिरू लागली.

रहाटणी : गावागावांचे मिळून शहर, शहराची कामगारनगरी त्यानंतर उद्योगनगरी- औद्योगिकनगरी म्हणून नावारूपास येताना पिंपरी-चिंचवड महानगर झाले. माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे यामहानगरातील झगमगाट वाढला आणि आर्थिक चक्रे झपाट्याने फिरू लागली. येथे मोठ्या प्रमाणात चाळी उभ्या राहिल्या.प्रशस्त घरे आणि बंगलेही आकारास आली; मात्र अर्थचक्रात ही संकल्पना मागे पडली आणि मोठमोठे गृहप्रकल्प शहरात उभारले गेले. परिणामी घर आणि चाळ संस्कृतीला ‘घर घर’ लागली. चाळी जमीनदोस्त झाल्याने सर्वसामान्यांना शहरात भाड्याने घर किंवा खोली मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ‘घर देता का कोणी घर’ असे म्हणण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.पिंपरी- चिंचवड शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. राज्यभरातून नव्हे, तर देशाच्या कानाकोपºयातून रोजगाराच्या उद्देशाने अनेक जण येथे स्थिरावण्यासाठी आसरा शोधू लागले. अनेक जण खोली किंवा घर भाडे स्वरूपात घेणे पसंत करतात. त्यासाठी या उपनगरातील अनेक स्थानिकांनी चाळी बांधून खोल्या भाडे स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला.मात्र सध्या या चाळींच्या जागी बहुमजली इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे या उपनगरातील अनेक दशकांची चाळ संस्कृती बंद झाली आहे. कमी भाडे दराचे घर नागरिकांना मिळणे मुश्कील झाले आहे. या शहरात सर्वसामान्यांना घर घेणे परवडत नाही; तर भाड्याने घर मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या औद्योगिक नगरीच्या चाळ संस्कृतीत सध्या घरघर लागल्याचे दिसून येत आहे.अतिश्रीमंत होण्याची स्पर्धाचाळींऐवजी गृहप्रकल्प किंवा बहुउद्देशीय प्रकल्प उभारल्यास अल्पावधीत कोट्यवधी रुपये मिळविण्याचा प्रयत्न जागा किंवा चाळमालकांकडून सुरू आहे. अन्य जागा किंवा चाळमालक याच माध्यमातून अतिश्रीमंत झाल्याचे दिसते. त्यामुळे आपणही अल्पावधीत अतिश्रीमंत होऊन आलिशान वाहने, दागदागिने खरेदी करावेत, अशी ईर्षा असते. असेचाळ किंवा जागामालक श्रीमंत असले, तरी अतिश्रीमंत होण्याची स्पर्धा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी चाळी पाडून गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत.शहरालगतच्या गावांत वाढताहेत चाळीशहरात रोजगाराच्या संधी आहेत. असे असले, तरी राहण्यास घर मिळत नाही. त्यामुळे अशा सामान्य कुटुंबीयांची परवड होत आहे. अनेक जणांना शहरालगत असलेल्या गावांमध्ये राहणे भाग पडत आहे. कामासाठी शहरात ये-जा करावी लागत आहे. परिणामी शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चाळी तयार होत आहेत. शहरातील चाळी कमी होत आहेत.भाडेतत्त्वावर घर किंवा खोली देताना भाडेकरार करून त्याची पोलीस ठाण्याला नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे घरमालक मेटाकुटीला आले आहेत. अनेकांनी चाळी पाडण्याचा सपाटा लावला आहे. चाळमालकांनी भाडे वाढविण्याचा सपाटा लावला आहे. सध्या शाळांना सुटी लागणार असल्याने अनेक कुटुंबे मूळ गावी जाण्याच्या बेतात आहेत. याच कालावधीत घरे भाड्याने मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण गल्लोगल्ली फिरून भाड्याने घर किंवा खोली उपलब्ध होईल का, याबाबत चौकशी करीत आहेत. ‘घर देता का कोणी घर’, असे म्हणत शहरभर हिंडण्याची वेळ या सर्वसामान्यांवर आली आहे.  

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजन