शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

उस्मानाबादेत फिर वही दिल लाया हूँ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 08:06 IST

भाऊबंदकीची लढत । पुन्हा वैयक्तिक टीकेवर भर; मतदारांच्या मुद्द्यांपासून प्रचार दूरच

उस्मानाबाद मतदारसंघात पाटील-राजेनिंबाळकर घराण्यात चुरशीची लढत होत आहे. या कुटुंबातील पारंपरिक वैर प्रचारात प्रतिबिंबित होत असून, कार्यकर्ते अजूनही मतदारांच्या मुद्यांवर यायला तयार नाहीत. या दोघांत झालेल्या मागच्या दोन विधानसभा निवडणुका या वैयक्तिक संघर्षावरच झाल्या होत्या. आता लोकसभेला आमनेसामने आल्यानंतरही पुन्हा तेच घडू पाहतेय.

राष्ट्रवादीकडून माजी मंत्री आ. राणा जगजीतसिंह पाटील, तर शिवसेनेकडून ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे आमनेसामने आहेत. तसे नात्याने हे दोघे चुलतभाऊच. मात्र, मागच्या पिढीतून आलेल्या वैमनस्याचा वारसा अजूनही तितक्याच त्वेषाने त्यांच्याकडून जपला जात आहे़ डॉ़ पद्मसिंह पाटील व पवनसिंह राजेनिंबाळकर या सख्ख्या चुलत भावांत वितुष्ट आल्यानंतर हे दोघे २००४ च्या विधानसभेला पहिल्यांदा आमनेसामने आले होते. पुढे पवनराजेंची हत्या झाल्यानंतर या कुटुंबातील वैर पुढच्या पिढीने जपले. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत त्याची प्रचिती येत आहे.

एकाच दिवशी दोघांचीही उमेदवारी जाहीर झाली. त्या दिवसापासूनच त्यांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले आहेत. असभ्य भाषेचा वापर करीत त्यांच्यात 'कार्टून स्ट्राईक' सुरू आहे. तप उलटले तरी निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा तेरणा कारखाना अन जिल्हा बँकच राहिला आहे. तो कोणी व कसा बुडविला, यावर कार्टुनद्वारे भाष्य सुरू आहे. या चिखलफेकीचे शिंतोडे थेट उमेदवारांवरच उडताना दिसत आहेत. 'एकास दोन' या समीकरणानुसार एक बाजूने एक कार्टून प्रसृत झाले की दुसरीकडून उत्तरादाखल दोन कार्टून 'लॉन्च' होताहेत. या दोघांच्या लढाईत वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. घराणेशाहीचा आरोप करीत वंचितांच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांच्याकडून प्रचारात केले जात आहे. उमेदवार अर्जुन सलगर प्रचारात व्यस्त असले तरी त्यांची बरीचशी भिस्त ही प्रकाश आंबेडकर, असदुद्दीन ओवैसी यांच्यावरच दिसून येते. सोबतच बसपानेही डॉ. शिवाजी ओमन यांना रिंगणात उतरविले आहे.

मित्रपक्षांच्या 'नेकीं'वर बरेचसे अवलंबून...

सेना-काँग्रेस अन् राष्ट्रवादी-भाजप, अशी आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांत पाहायला मिळाली़ मात्र, या अभद्र आघाड्या आता तोडायच्या असे ठरले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची व भाजपची ताकद बेदखल करावी अशी निश्चितच नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवार मित्रपक्षाच्या मदतीवर बरेचसे विसंबून आहेत. आजवरचा अनुभव पाहता मित्रपक्षांची ही नेकी शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे.वैयक्तिक टीका-टिपण्या हा आपला अजेंडा नाही़ आम्ही आजवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात जिल्ह्यात जी काही विकासकामे झाली आहेत त्यावर व भविष्यात जी विकासकामे आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून करु शकतो, रोजगार मिळवू शकतो, यावरच भर देत आहोत़- राणा पाटील, राकॉदीर्घकाळ सत्तेत राहूनही जिल्ह्याचा विरोधकांनी विकास केला नाही़ ही बाब प्रकर्षाने मांडतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वसामान्यांसाठी असलेली धोरणे, राष्ट्राभिमान तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शेतकरी, सामान्यांप्रती असलेली ठाम भूमिका व त्यांच्या नजरेतील विकास घेऊन मतदारांसमोर जात आहोत़- ओम राजेनिंबाळकर, सेनाप्रमुख उमेदवारराणा पाटील । राकॉओम राजेनिंबाळकर । सेनाअर्जुन सलगर। वंचित आघाडीकळीचे मुद्देउस्मानाबाद मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प नाही़ रोजगारासाठी तरुणांना पुणे-मुंबईची वाट धरावी लागते़शेतकरी आत्महत्येत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे़ त्यांच्यासाठी ठोस उपाय योजना अंमलात आणली जात नाही़

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादosmanabad-pcउस्मानाबाद