शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी पाेलीस मुख्यालयासमाेर उपाेषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

कळंब : तक्रारी अर्जाची दखल न घेणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ ...

कळंब : तक्रारी अर्जाची दखल न घेणाऱ्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील एका कुटुंबाने शनिवारी पाेलीस मुख्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे.

वारंवार तक्रारी अर्ज करूनही पोलीस यंत्रणा दखल तर घेतच नाही, परंतु आपल्यालाच पोलिसांकडून समजपत्र दिले जात आहे. आपल्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितावर गुन्हा नोंद करावा व कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, या मागणीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे हे उस्मानाबाद पोलीस मुख्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाने २००५-०६ मध्ये डिकसळ येथील शेतकरी सचिन वाघमारे यांच्या शेतातून रस्त्याचे काम मंजूर केले हाेते. या कामास वाघमारे यांनी हरकत घेतली. ‘‘माझ्या मालकीच्या शेतातून रस्त्याचे काम केले जाऊ नये’’, असे बांधकाम विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांना सांगितले हाेते, असे असतानाही त्यांनी हे काम रेटून नेले. ही बाब वाघमारे यांनी शासनाच्या विविध विभागासह पाेलीस यंत्रणेच्याही निदर्शनास आणून दिली हाेती. तसा तक्रारी अर्जही दाखल केला हाेता. परंतु, त्यांच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली नाही. उलट वाघमारे यांनाच समजपत्र पाठविण्यात आले. वारंवार अर्ज, विनंती करूनही संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याची भूमिका पाेलीस अधिकाऱ्यांनी घेतली, असा आराेप करीत वाघमारे यांनी सहकुटुंब पाेलीस अधीक्षक कार्यालयासमाेर उपाेषण सुरू केले आहे. तक्रारी अर्जाची दखल न घेतलेल्या पाेलीस अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

140821\img-20210814-wa0089.jpg

तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाहीसाठी कळंब तालुक्यातील डिकसळ येथील सटवा वाघमारे हे कुटुंबासह उस्मानाबाद येथे उपोषणास बसले आहेत.