शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

आपत्तीत शेतमजूर वाऱ्यावरच, मदत हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवितहानी घडून आल्यास शेतकऱ्यांना मदतीची तरतूद आहे. मात्र, अनेक शेतमजूर हे पशुपालनही करतात. त्यांच्या ...

उस्मानाबाद : नैसर्गिक आपत्तीत पशुधनाची जीवितहानी घडून आल्यास शेतकऱ्यांना मदतीची तरतूद आहे. मात्र, अनेक शेतमजूर हे पशुपालनही करतात. त्यांच्या पशूची हानी झाल्यास मदतीबाबत कसलीही तरतूद सध्या नाही. त्यामुळे या घटकातंर्गत लाभार्थी संकल्पनेची व्याप्ती वाढवून शेतमजुरांनाही मदत मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी, असे साकडे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून घातले आहे. राज्याची अर्थव्यवस्था आजही प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. साधारणतः ६० टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, यामध्ये भूमिहीन शेतमजुरांची संख्याही मोठी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत उस्मानाबादेत किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातच शेतीला पूर, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. पिकांच्या नुकसानीसोबतच शेतकऱ्यांचा आधार असलेले पशुधन पाण्यात वाहून जाणे अथवा वीज पडून जनावरे दगावणे, अशा घटना घडून नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही गतवर्षीच्या अतिवृष्टीत व यावर्षीही अशा घटनांनी मोठे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई म्हणून महसूल व वन विभागाच्या २०१५ मधील शासन निर्णयानुसार आर्थिक मदत दिली जाते. परंतु, यामध्ये केवळ अत्यल्पभूधारक व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच ही मदत मिळते. निकषांमध्ये शेतमजुरांचा समावेश नाही. एखाद्या शेतमजुराचे पशुधन नैसर्गिक आपत्तीमुळे दगावल्यास तो मदतीस पात्र ठरत नाही. शेतमजुराकडे उपजीविकेचे साधन म्हणून शेतजमीनही नसते. नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या पशुधनाचे नुकसान झाल्यास त्यास फार मोठ्या आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन मदतीस पात्र लाभार्थी निकषात सुधारणा होऊन शेतमजुरांनाही त्यात अंतर्भूत करावे, असे साकडे खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून घातले आहे.