शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

पंधरा दिवसांपासून तीन रोहीत्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या ...

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला.

जोतिबाचीवाडी हे गाव उस्मानाबाद-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून, या गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात आहे. वीज वितरण कंपनीच्या येथील उपकेंद्रमधून या गावासाठी वीज पुरवठा केला जातो. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी साळुंखे वस्तीजवळ सिंगल फेजचे १५ केव्हीए क्षमतेचे तीन रोहीत्र बसविण्यात आले आहेत. परंतु, पंधरा दिवसापूर्वी हे तिन्ही रोहीत्र जळाल्याने गणपती, महालक्ष्मी या सणाच्या कालावधीमध्ये गावात अंधाराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या एका थ्री फेज ट्रान्सफार्मरवरून कधी दिवसा तर कधी रात्री फक्त आठ तास वीज पुरवठा होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दरम्यान, काही वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली असता अगोदर आपल्याकडे थकित असलेले वीज बिल भरा व त्यानंतर सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, असे अजब उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

चौकट........

कारवाईची मागणी

सिंगल फेजचे रोहीत्र बदलण्यासाठी काढून दुरुस्तीसाठी पाठविल्यानंतर यंत्रणेकडून पुन्हा नादुरुस्त व खराब रोहीत्र मिळत असून, बदलून आणलेले रोहीत्र बसवताच त्यामध्ये लगेचच बिघाड होत आहे. पंधरा दिवसात दोन वेळा रोहीत्र बदलून आणले तरीही अंधार कायम आहे. त्यामुळे दोषपूर्ण रोहीत्र पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे यांनी केली आहे.