शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
6
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
7
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
8
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
9
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
10
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
11
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
12
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
13
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
14
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
15
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
16
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
17
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
18
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
19
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
20
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांपासून तीन रोहीत्र नादुरूस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:36 IST

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या ...

ईट : भूम तालुक्यातील ज्योतीबाचीवाडी गावासाठी वीजपुरवठा करणारे वीज वितरण कंपनीचे १५ केव्हीए क्षमतेचे सिंगल फेजचे तीन रोहीत्र गेल्या पंधरा दिवसापासून नादुरुस्त आहेत. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागला.

जोतिबाचीवाडी हे गाव उस्मानाबाद-अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असून, या गावची लोकसंख्या दीड हजाराच्या घरात आहे. वीज वितरण कंपनीच्या येथील उपकेंद्रमधून या गावासाठी वीज पुरवठा केला जातो. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी साळुंखे वस्तीजवळ सिंगल फेजचे १५ केव्हीए क्षमतेचे तीन रोहीत्र बसविण्यात आले आहेत. परंतु, पंधरा दिवसापूर्वी हे तिन्ही रोहीत्र जळाल्याने गणपती, महालक्ष्मी या सणाच्या कालावधीमध्ये गावात अंधाराचे साम्राज्य पसरले. दुसऱ्या एका थ्री फेज ट्रान्सफार्मरवरून कधी दिवसा तर कधी रात्री फक्त आठ तास वीज पुरवठा होत असल्याने ग्राहकांना नाहक त्रास होत आहे. दरम्यान, काही वीज ग्राहकांनी वीज वितरण कंपनीकडे सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली असता अगोदर आपल्याकडे थकित असलेले वीज बिल भरा व त्यानंतर सुरळीत वीज पुरवठा केला जाईल, असे अजब उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

चौकट........

कारवाईची मागणी

सिंगल फेजचे रोहीत्र बदलण्यासाठी काढून दुरुस्तीसाठी पाठविल्यानंतर यंत्रणेकडून पुन्हा नादुरुस्त व खराब रोहीत्र मिळत असून, बदलून आणलेले रोहीत्र बसवताच त्यामध्ये लगेचच बिघाड होत आहे. पंधरा दिवसात दोन वेळा रोहीत्र बदलून आणले तरीही अंधार कायम आहे. त्यामुळे दोषपूर्ण रोहीत्र पुरवठा करणाऱ्या संबंधित यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी माजी सरपंच बाळासाहेब जगदाळे यांनी केली आहे.