शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

...तर पायातली 'कोल्हापुरी' हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 16:01 IST

Raju Shetty: कोल्हापुरचे कारखानदार काय साधू संत आहेत का ? सगळेच सारखे आहेत. पण आम्ही ऊसाचा दांडका हातात घेऊन त्यांना वठणीवर आणले आहे.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायत हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तो नाही केला तर तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही. लढायला शिका, रडत बसू नका, असा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी शेतकऱ्यांना दिला. 

लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी राञी आठ वाजता ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी बळीराम दळवे हे होते. तर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवती आघाडी अध्यक्ष पूजाताई मोरे, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे , उपसरपंच वामन भोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडीत ढोणे, गजानन बगळे पाटील, अशोक मुटकुले, राजाभाऊ हक्के, बापू थिटे, सुनील गरड, केशव पाटील, राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना माजी खा. राजू शेट्टी म्हणाले की, तुमचे कारखानदार सात आठ महीने ऊसाचे पैसे देत नाही. हे दुर्दैव आहे. कायदा काय सांगतो ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत सरकारने जो बांधून दिलेला हमी भाव आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. नाही दिले तर त्याला १५ टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले. 

ऊसाचा दांडका हातात घ्याकोल्हापुरचे कारखानदार काय साधू संत आहेत का ? सगळेच सारखे आहेत. पण आम्ही ऊसाचा दांडका हातात घेऊन त्यांना वठणीवर आणले आहे. तुम्ही ही हातात ऊसाचा दांडका घ्या बघू कसा न्याय मिळत नाही. मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रस्ताविक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवाजी साठे यांनी केले. या ऊस परीषदेला शेतकरी मोठ्यासंख्ये उपस्थित होते. 

परिषदेतील ठराव :या ऊस व सोयाबिन परिषदेत उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, उसाची एक रक्कमी एफआरपी मिळावी, वीज बिल ऊसाच्या बिलातून वसुलीचा शासन निर्णय रद्द करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये द्यावे, शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी