शहरं
Join us  
Trending Stories
1
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
2
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
3
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
4
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
5
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
6
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
7
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
8
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
9
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
10
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
11
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
12
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
13
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
14
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
15
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
16
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
17
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
18
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
19
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
20
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस

...तर पायातली 'कोल्हापुरी' हातातही घ्यायला शिका; राजू शेट्टी यांचा शेतकऱ्यांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 16:01 IST

Raju Shetty: कोल्हापुरचे कारखानदार काय साधू संत आहेत का ? सगळेच सारखे आहेत. पण आम्ही ऊसाचा दांडका हातात घेऊन त्यांना वठणीवर आणले आहे.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : कोल्हापुरची माणस नुसतेच कोल्हापुरी पायतन घालत नाहीत. तर वेळप्रसंग पडला तर हातात सुध्दा घेतात म्हणून त्यांना न्याय मिळतो. लक्षात ठेवा म्हणून तुम्ही पायत हातात घ्यायला शिका काटा मोडतो म्हणूनच पायात घालायचं नाही. कधी कधी पायतनाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी सुध्दा करायचा असतो, तो नाही केला तर तुम्हाला आयुष्यात न्याय मिळणार नाही. लढायला शिका, रडत बसू नका, असा असा सल्ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी ( Raju Shetty ) यांनी शेतकऱ्यांना दिला. 

लोहारा तालुक्यातील माकणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी राञी आठ वाजता ऊस व सोयाबीन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी बळीराम दळवे हे होते. तर उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगे, युवती आघाडी अध्यक्ष पूजाताई मोरे, माकणीचे सरपंच विठ्ठल साठे , उपसरपंच वामन भोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंडीत ढोणे, गजानन बगळे पाटील, अशोक मुटकुले, राजाभाऊ हक्के, बापू थिटे, सुनील गरड, केशव पाटील, राजू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना माजी खा. राजू शेट्टी म्हणाले की, तुमचे कारखानदार सात आठ महीने ऊसाचे पैसे देत नाही. हे दुर्दैव आहे. कायदा काय सांगतो ऊस तोडणीनंतर १४ दिवसांच्या आत सरकारने जो बांधून दिलेला हमी भाव आहे. त्याप्रमाणे विना कपात एक रक्कमी रक्कम दिली पाहीजे. नाही दिले तर त्याला १५ टक्के व्याजाची आकारणी करुन पैसे शेतकऱ्यांना द्यावे. पण हे कारखानदार वेळेवर पैसे देत नाहीत. तुम्ही गप्प का बसता आवाज उठवा असे आवाहनही शेट्टी यांनी यावेळी केले. 

ऊसाचा दांडका हातात घ्याकोल्हापुरचे कारखानदार काय साधू संत आहेत का ? सगळेच सारखे आहेत. पण आम्ही ऊसाचा दांडका हातात घेऊन त्यांना वठणीवर आणले आहे. तुम्ही ही हातात ऊसाचा दांडका घ्या बघू कसा न्याय मिळत नाही. मी तुमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रस्ताविक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले. तर सूत्रसंचालन शिवाजी साठे यांनी केले. या ऊस परीषदेला शेतकरी मोठ्यासंख्ये उपस्थित होते. 

परिषदेतील ठराव :या ऊस व सोयाबिन परिषदेत उस्मानाबाद जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा, उसाची एक रक्कमी एफआरपी मिळावी, वीज बिल ऊसाच्या बिलातून वसुलीचा शासन निर्णय रद्द करावा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये द्यावे, शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन द्यावे 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी