शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अपयश झाकण्यासाठीच सत्ताधारी-विरोधकांची चिखलफेक; तुमचा खेळ होतो, लोकांचा जीव जातो - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 11:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते.

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : राज्यातील वीज भारनियमनामुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला भाव नाही. इंधन, गॅस, खते, कीटकनाशक यांच्या दरात भरमसाठ वाढ होऊन महागाई वाढली आहे. राज्य आणि केंद्र सरकारचे हे अपयश आहे. ते झाकण्यासाठीच धार्मिक प्रश्न उपस्थित करून एकमेकांवर चिखलफेक केली जात असल्याचा आरोप माजी खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बळीराजा हुंकार यात्रेनिमित्ताने राजू शेट्टी मंगळवारी तुळजापुरात आले होते. यावेळी ते म्हणाले की, महागाईचे अपयश लपवण्यासाठी भाजप ईडी व धार्मिक प्रश्न उपस्थित करून राज्यात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे, तर राज्य सरकारही विरोधकांच्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आपला वेळ खर्ची घालत आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यापेक्षा इंधन दरवाढ, वीजप्रश्नी पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला.

पवारांना हे माहिती नाही का?ऊस हे शेतकऱ्यांना आळशी बनवणारे पीक असल्याचे विधान खा. शरद पवार यांनी केले आहे. त्यावर राजू शेट्टी म्हणाले की, ऊस हे शेतकऱ्यांचे आळशी पीक नाही. ते हमीभाव देणारे खात्रीचे पीक असल्याने शेतकरी त्याचे उत्पादन घेतात. माजी कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवार यांना हे माहिती नाही का, असा सवालही शेट्टी यांनी केला.कोळसाटंचाई; पैसे लाटायचा बहाणा...राज्यात सध्या कोळसाटंचाई असल्याचे सांगण्यात येत आहे. इकडे कोळशाची टंचाई दाखवायची अन् दुसरीकडे बेसुमार भावाने वीज खरेदी करून पैसे लाटायचे, यासाठी हा खटाटोप आहे. वीज खरेदी करण्यापेक्षा कोळसाच का खरेदी करीत नाही, असा आरोपही शेट्टी राज्य सरकारवर केला. 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपा