शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात

By बाबुराव चव्हाण | Updated: January 15, 2024 19:06 IST

सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे.

धाराशिव : एकीकडे शेतीमालाचे भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींना आयातीस मुभा दिली जाते. आणि दुसरीकडे उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर साेडले जाते. सरकारच्या अशा शेतकरी विराेधी धाेरणामुळेच बळीराजा अडचणीत आला आहे. आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मागील अडीच वर्षांच्या तुलनेत वर्षभरात अडीच टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले आहेत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघात केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर माेर्चा काढण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, आज सोयाबीनला भाव मिळत नाही. दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशातील ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. पाम तेलाची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. आणि साेयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला माेठा फटका बसला. सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे. तर, उद्याेगपती श्रीमंत, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जेवढी कर्जमाफी ६५ टक्के शेतकऱ्यांना दिली, त्या तुलनेत १ टक्का असलेल्या उद्याेगपतींना मात्र, १० पट कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे आता या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचा सातबारा काेरा झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी