शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले; राजू शेट्टी यांचा घणाघात

By बाबुराव चव्हाण | Updated: January 15, 2024 19:06 IST

सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे.

धाराशिव : एकीकडे शेतीमालाचे भाव पाडून, निर्यातबंदी करून उद्योगपतींना आयातीस मुभा दिली जाते. आणि दुसरीकडे उद्योगपतींचे भरमसाठ कर्ज माफ करून शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर साेडले जाते. सरकारच्या अशा शेतकरी विराेधी धाेरणामुळेच बळीराजा अडचणीत आला आहे. आत्महत्येसारखे टाेकाचे पाऊल उचलत आहे. मागील अडीच वर्षांच्या तुलनेत वर्षभरात अडीच टक्क्यांनी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून शेतकऱ्यांच्या रक्ताने सरकारचे हात बरबटले आहेत, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी घणाघात केला.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर माेर्चा काढण्यात आला हाेता. यावेळी ते बाेलत हाेते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले, आज सोयाबीनला भाव मिळत नाही. दुधाची दरवाढ तीन महिन्यांपर्यंत टिकते. त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. सध्या सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळे देशातील ३० लाख लोकांचा रोजगार बुडाला आहे. पाम तेलाची आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. आणि साेयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणा अशा मालाला माेठा फटका बसला. सरकारच्या अशा धाेरणामुळे शेतकरी आणखी कंगाल हाेत आहे. तर, उद्याेगपती श्रीमंत, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जेवढी कर्जमाफी ६५ टक्के शेतकऱ्यांना दिली, त्या तुलनेत १ टक्का असलेल्या उद्याेगपतींना मात्र, १० पट कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे आता या सरकारला जाब विचारण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचा सातबारा काेरा झाल्याखेरीज आपण स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शेतकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी