शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

एका बॅगला दहा किलो उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

तामलवाडी : खरीप हंगामात पेरणी केलेल्या उडीद पिकाला पावसाच्या विलंबाचा मोठा फटका बसला. ऐन शेंगा लागताना पावसाने ओढ दिल्याने ...

तामलवाडी : खरीप हंगामात पेरणी केलेल्या उडीद पिकाला पावसाच्या विलंबाचा मोठा फटका बसला. ऐन शेंगा लागताना पावसाने ओढ दिल्याने झाडाला चार-चारशेंगा लागल्या असून, तुळजापूर तालुक्यातील सांगवी (काटी) शिवारात एका उडीदाच्या बॅगला केवळ १० किलोचे उत्पादन पदरात पडले. यामुळे पेरणीचा खर्चही निघाला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सांगवी (काटी) शिवारात नारायण मगर यानी खरीप हंगामात उडीदाची एका बॅगची पेरणी केली. त्यासाठी खत औषधाचा वापर केला. पेरणी फवारणी, कापणी, मळणी यासाठी हजारोचा खर्च केला. शनिवारी कापणी केलेल्या उडीदाच्या काडाची यंत्राद्वारे मळणी केली. यावेळी ३० किलोच्या एका बॅगला केवळ १० किलोचा उतारा मिळाला. बाजारात उडीदाला ६ ते ७ हजार रुपये भाव असला तरी शेतकऱ्याचा पदरात उडीदाचा उतारा नगण्य पडत असल्याने खरीप हंगामातील उत्पादनाचे नियोजन कोलमडले आहे. दरम्यान,काही महिन्याच्या कालखंडानंतर पडलेल्या पावसाने उडीदाच्या शेंगातील बियाणाची झाडाला उगवण होत असल्याने त्याचाही फटका उडीद उत्पादक शेतकऱ्याना बसला आहे. उत्पादनात उतारा कमी अन् शेगातील बिया उगवू लागल्याने एकरी ८ ते १० क्विंटंल मिळणारा उतारा १० किलोवर आल्याने उत्पादनात ९९ टक्के घट आली आहे. उडीद पिकाचा विमा लागू करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

चौकट

सोयाबीनच्या उत्पादनात होणार घट

सोयाबीनच्या झाडाला फूल लागताना पावसाने दीड महिना ओढ दिली. त्यामुळे पावसाअभावी काही कृषी मंडळात २० हजार हेक्टर क्षेत्र करपून जात आहे. झाडाला लागलेल्या सोयाबीन शेंगात बियाणाची फुगवण झाली नसून, ५० टक्के शेंगा चोपट झाल्या आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात कमालीची घट येण्याची भीती उडीद पिकाच्या उत्पादनावरून व्यक्त केली जात आहे.