शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी ...

उस्मानाबाद : राज्यातील मातंग समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांचा निषेध क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाने नोंदवून अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सतत मातंग समाजावर अन्याय होत आहे. कंधार तालुक्यात अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा पोलीस व प्रशासनाने बळाचा वापर करून काढून मातंग समाजावर लाठीचार्ज केला. महिलांना अमानुषपणे मारहाण केली. सोलापूर जिल्ह्यातील माळेवाडी येथील धनाजी साठे यांच्या अंत्ययात्रेस जातीयवादी गुंडांनी अडवून विटंबना करण्यात आली, चिंचवड येथील अल्पवयीन मुलीवर तिघांनी अत्याचार करून आरोपी फरार झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथील मातंग समाजातील अनाथ व मूकबधिर मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला. अशा घटना वाढत आहेत. मात्र, शासानाकडून गुन्हेगारांवर कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांचे मनोबल वाढत आहे. अशा अत्याचारी जातीयवादी गावगुंडांना आळा बसावा, जलदगती स्वतंत्र न्यायालय स्थापन करून महाराष्ट्रातील मातंग समाजावरील होणारे अन्याय, अत्याचार थांबवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर एम. आर. खिल्लारे, सुरेश खंदारे, संजय साठे, ॲड. राजू कसबे, माणिक साठे, बी. एफ. रसाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.