शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

तडवळ्याच्या हुरड्याला मिळाली सोशल मीडियाची बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 19:44 IST

तरुण शेतकर्‍यांनी हुरड्याची सोशल मीडियावर अचाट मार्केटिंग करुन थोडथोडके नव्हे शेतमालाला चार ते पाचपट अधिक भाव मिळवून घेतला़

उस्मानाबाद : शेतीतील तंत्रज्ञानाचा वापर हा शेतमाल उत्पन्नवृद्धीसाठी पूरक मानला जात होता़ मात्र, शेतकरी तंत्रनाज्ञाचा वापर करुन पदरी पडलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळवून घेऊ शकतात, हे सिद्ध केलंय कसबे तडवळ्याच्या कल्पक तरुणांनी. येथील तरुण शेतकर्‍यांनी हुरड्याची सोशल मीडियावर अचाट मार्केटिंग करुन थोडथोडके नव्हे शेतमालाला चार ते पाचपट अधिक भाव मिळवून घेतला़

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळा येथील तरुण शेतकरी महेश जमाले व त्यांच्या इतर दहाएक सहकार्‍यांनी सेंद्रीय शेतीला सुरुवात केली आहे़ याअंतर्गत त्यांनी २० गुंठे जमिनीवर हुरड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ज्वारीची लागवड केली होती़ यादरम्यान, त्यांनी ‘ओन्ली आॅरगॅनिक’ नावाचा एक व्हाट्सअप ग्रुपही तयार केला़ या ग्रुपच्या माध्यमातून सेंद्रीय शेती व उत्पादनाविषयीच्या माहितीचे आदान-प्रदान सुरु होते़ इकडे ज्वारीच्या लागवडीला ४ महिने पूर्ण होत आले होते़ ज्वारी हुरड्यात आली होती़ ती वाळून ज्वारीचे उत्पादन घ्यावे तर बाजारपेठेत पुरेसा भाव दिसत नव्हता़ त्यामुळे या युवकांनी हुरडाच विकायचा निर्धार केला़ मग त्यांनी व्हॉट्स ग्रुपवर आपापल्या  ओळखीचे व महानगरांमध्ये राहणार्‍या नागरिकांचे क्रमांक मिळवून आपल्या गुपला जोडले़ या ग्रुपच्या माध्यमातून मग त्यांनी सेंद्रीय हुरड्याची मार्केटिंग सुरु केली़ त्यासाठी काही व्हीडिओही बनविले़ हे व्हीडिओ व इतर माहिती प्रसारित करुन हुरड्याची चांगलीच मागणी त्यांनी मिळविली़ अगदी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद शहरांपर्यंत त्यांनी आपले मार्केट बसविले़ आपल्या संपूर्ण ज्वारीचा वापर महानगरांतील हुरडा पार्ट्यांसाठी करुन या युवकांनी २० गुंठ्यातच प्रत्येकी सरासरी ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे़ 

हुरड्यातही त्यांनी ग्राहकांपुढे दोन पर्याय दिले होते़ तयार हुरडा जास्त काळ टिकणार नाही, याची माहिती देवून तो दीर्घकाळासाठी वापरायचा असेल तर थेट ज्वारीची कणसे पाठविण्याचीही सोय करुन दिली़ त्यापासून हवा तेव्हा हुरडा कसा तयार करायचा याबाबतची माहिती नागरिकांना दिली़ त्यामुळे प्रचंड मागणी आली व उत्पन्नही चांगले मिळाल्याचे महेश जमाले म्हणाले़ आपल्या कल्पकतेची तंत्रज्ञानाशी सांगड घालून तडवळ्यातील या युवकांनी घसघशीत उत्पन्न पदरी पाडून घेतले आहे़

असा झाला फायदासाधारणत: ज्वारी येण्यासाठी ५ ते ६ महिने कालावधी थांबावे लागते़ त्यातही सध्याचा भाव लक्षात घेता २० गुंठ्यातून फारतर १० हजार रुपयांची ज्वारी झाली असती़ मात्र, हुरड्यामुळे सरासरी ४० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे़ शिवाय, दीड-दोन महिने आधीच रान इतर पिकासाठी मोकळे झाले, हा फायदा वेगळाच !

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादFarmerशेतकरी