शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

'एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 20:53 IST

शेतक-यांना उस गेल्यापासून १४ दिवसाच्या आत बिल देण्यात यावे

उस्मानाबाद : चालू वर्षातील गाळप हंगामातील उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ 

‘शेतकऱ्यांच्या उसाला एफ़आऱपी़ नुसार हमीभाव मिळालाच पाहिजे़ पशुंच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केलेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, शेतकरी संघटनेचा विजय’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, शेतक-यांना उसाचे बिल हे जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील साखर कारखाने १७०० रुपयाप्रमाणे उचल देत आहेत़ परंतु एफआरपीप्रमाणे ही रक्कम २२०० ते २३०० रुपये होते़ शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे एक रक्कमी रक्कम साखर कारखान्यांनकडून मिळाली पाहिजे़ शेतक-यांना उस गेल्यापासून १४ दिवसाच्या आत बिल देण्यात यावे, जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडल्याने प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशीही मागणी यावेळी लावून धरली होती़ तसेच कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये दर देण्यात यावा, उस्मानाबाद, लोहारा तालुक्याचा मंजूर पीक विमा वितरीत करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला

यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, तानाजी पाटील यांच्यासह वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़

टॅग्स :agitationआंदोलनOsmanabadउस्मानाबादSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना