शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

चांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:48 PM

‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ सत्काराला दिले होते प्रत्युत्तर

कळंब  (जि. उस्मानाबाद) : कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अक्षय देवकर (१६) या विद्यार्थ्याने दहावीत प्रतिकूल स्थितीत ९४.२० टक्के गुण घेऊन बाजी मारली. परंतु, बेताची आर्थिक स्थिती पुढे शिक्षणात ‘तग’ धरेल का? या भयाने मात्र त्याला जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील देवळाली येथे गुरुवारी घडली आहे.

शहाजी गोविंद देवकर हे देवळाली गावातील एक अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी. जेमतेम तीन एकर जमीन. यात दुष्काळ पाचवीला पुजलेला. वारंवार निर्माण होत असलेल्या दुष्टचक्राशी संघर्ष करत असलेल्या शहाजी यांचा एकुलता एक मुलगा अक्षय हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा. यामुळेच परिस्थितीशी दोन हात करत शहाजी यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लातूरची निवड केली. याठिकाणी मुलात दरवर्षी सुधारणा होत होती. कोणतेही विशेष ‘क्लास’ न लावता त्याने प्रत्येक वर्गात विशेष प्रावीण्य मिळविणे सुरू ठेवले होते. नुकतीच त्याची लातूर येथील एका खाजगी शाळेत दहावी झाली होती. निकालात तो शाळेत ९४.२० टक्के गुण घेऊन अव्वल ठरला होता. अशा या होतकरू अक्षयला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तो लातुरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी महत्त्वाकांक्षा बाळगून होता. त्यासाठी त्याने प्रवेश अर्जही दाखल केला होता. परंतु, या सर्व प्रवासात त्याला आपण चांगले गुण घेतले असले तरी वाढत्या स्पर्धेत आपल्याला चांगले कॉलेज मिळेल का? बेताच्या आर्थिक स्थितीत आपण तग धरू का? अशी भीती त्याला सतत सतावत होती. अलीकडे तो हा विषय जवळच्या मित्रांना व घरातील व्यक्तींना बोलून दाखवत होता. शेवटी या भीतीतून निर्माण झालेल्या वैफल्यातून अक्षय या १६ वर्षीय मुलाने दुर्दैवी मार्ग पत्करला. आपली आई केज तालुक्यातील माहेरी व वडील शहाजी हे शेतात गेले असताना अक्षयने गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. आई निर्मला या माहेरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अक्षय याच्यावर देवळाली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शिराढोण पोलीसांनी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सत्काराचे नंतर पाहूहोतकरू अक्षय याचा गावातील काही युवकांनी सत्कार आयोजित केला होता; परंतु, संवेदनशील मनाच्या अक्षयने तो सत्कार नाकारला. ‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ असे त्याने म्हटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

परिसरातील तिसरी घटनागतवर्षी मार्च महिन्यात याच गावातील तृष्णा तानाजी माने या १९ वर्षीय विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केली होती. शिवाय पिंपरी (शि) येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रगती राऊत या २० वर्षीय विद्यार्थिनीने गत नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. या भागातील ही अलीकडील काळातील तिसरी घटना आहे.