शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

चांगल्या कॉलेजला प्रवेश न मिळण्याच्या भीतीने आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:49 IST

‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ सत्काराला दिले होते प्रत्युत्तर

कळंब  (जि. उस्मानाबाद) : कुटुंबाच्या वंशाचा दिवा असलेल्या अक्षय देवकर (१६) या विद्यार्थ्याने दहावीत प्रतिकूल स्थितीत ९४.२० टक्के गुण घेऊन बाजी मारली. परंतु, बेताची आर्थिक स्थिती पुढे शिक्षणात ‘तग’ धरेल का? या भयाने मात्र त्याला जीवनाच्या परीक्षेत अपयशी ठरवल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील देवळाली येथे गुरुवारी घडली आहे.

शहाजी गोविंद देवकर हे देवळाली गावातील एक अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी. जेमतेम तीन एकर जमीन. यात दुष्काळ पाचवीला पुजलेला. वारंवार निर्माण होत असलेल्या दुष्टचक्राशी संघर्ष करत असलेल्या शहाजी यांचा एकुलता एक मुलगा अक्षय हा कुशाग्र बुद्धिमत्तेचा. यामुळेच परिस्थितीशी दोन हात करत शहाजी यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी लातूरची निवड केली. याठिकाणी मुलात दरवर्षी सुधारणा होत होती. कोणतेही विशेष ‘क्लास’ न लावता त्याने प्रत्येक वर्गात विशेष प्रावीण्य मिळविणे सुरू ठेवले होते. नुकतीच त्याची लातूर येथील एका खाजगी शाळेत दहावी झाली होती. निकालात तो शाळेत ९४.२० टक्के गुण घेऊन अव्वल ठरला होता. अशा या होतकरू अक्षयला डॉक्टर व्हायचे होते. यासाठी तो लातुरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी महत्त्वाकांक्षा बाळगून होता. त्यासाठी त्याने प्रवेश अर्जही दाखल केला होता. परंतु, या सर्व प्रवासात त्याला आपण चांगले गुण घेतले असले तरी वाढत्या स्पर्धेत आपल्याला चांगले कॉलेज मिळेल का? बेताच्या आर्थिक स्थितीत आपण तग धरू का? अशी भीती त्याला सतत सतावत होती. अलीकडे तो हा विषय जवळच्या मित्रांना व घरातील व्यक्तींना बोलून दाखवत होता. शेवटी या भीतीतून निर्माण झालेल्या वैफल्यातून अक्षय या १६ वर्षीय मुलाने दुर्दैवी मार्ग पत्करला. आपली आई केज तालुक्यातील माहेरी व वडील शहाजी हे शेतात गेले असताना अक्षयने गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. आई निर्मला या माहेरून परत आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, अक्षय याच्यावर देवळाली गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी शिराढोण पोलीसांनी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

सत्काराचे नंतर पाहूहोतकरू अक्षय याचा गावातील काही युवकांनी सत्कार आयोजित केला होता; परंतु, संवेदनशील मनाच्या अक्षयने तो सत्कार नाकारला. ‘‘सत्कार आता नको, मला चांगले कॉलेज मिळू द्या, मग मदत करा’ असे त्याने म्हटल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

परिसरातील तिसरी घटनागतवर्षी मार्च महिन्यात याच गावातील तृष्णा तानाजी माने या १९ वर्षीय विद्यार्थ्यांनीने आत्महत्या केली होती. शिवाय पिंपरी (शि) येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रगती राऊत या २० वर्षीय विद्यार्थिनीने गत नोव्हेंबर महिन्यात आत्महत्या केली होती. या भागातील ही अलीकडील काळातील तिसरी घटना आहे.