शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे वसतिगृह केवळ नावालाच ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 20:26 IST

वसतिगृहात फक्त निवासाची सोय; मेसचा नाही पत्ता... 

उस्मानाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान सरकारने या समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह सुरू करू, अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार यंदा येथे वसतिगृह सुरू होत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर सदरील वसतिगृहात केवळ मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. परंतु, ज्यांचे उत्पन्न ८ लााखांच्या आत आहे, अशा सर्वच घटकांना प्रवेश दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, येथे केवळ निवासाची सोय आहे. जेवणाचा पत्ता नाही. आणि वसतिगृहासाठी जी वास्तू निश्चित केली आहे, तीही गैरसोयीचीच अधिक असल्याने संताप व्यक्त होत आहे.

मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली होती. महाराष्ट्रबंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा मुद्दा उपसिथत केला होता. त्यानुसार समाजातील मुलांसाठी साधारपणे वर्षभरापूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे डॉ़ पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. वसतिगृहासाठी इमारतही निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृहाच्या धर्तीवर केवळ समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे अपेक्षित होते. तसे आंदोलनादरम्यान सांगितलेही जात होते. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली असता, अनेक बाबी समोर येवू लागल्या आहेत. ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. 

मराठा समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी आलेल्या अनेकांना जेवनाचा आणि निवासाचा खर्च भागवणे कठीण होते. हा प्रश्न लक्षात घेऊन आंदोलनादरम्यान वसतिगृहाची मागणी पुढे आली होती. मात्र, सरकार जे वसतिगृह सुरू करीत आहे, तेथे केवळ निवासाची सोय आहे. जेवनाचा (मेस) पत्ता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवनाचे काय? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. हे थोडके म्हणून की काय, वसतिगृहासाठी निश्चित केलेली इमारतही सोयीची कमी अन् गैैरसोयीची अधिक आहे. तंत्रनिकेतन कॉलेज परिसरातील इमारतीत हे वसतिगृह चालविले जाणार आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला तेरणा महाविद्यालय अथवा भोसले कॉलेजला यायचे म्हटले तर दररोज प्रवास भाड्यापोटी  किमान तीस ते चाळीस रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच प्रवास भाड्यावर महिन्याकाठी हजार ते बाराशे रूपये खर्च होतील. आणि शासन निर्वाह भत्ता म्हणून केवळ आठ हजार रूपये विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे. सदरील रक्कम ज्या संस्थेने वसतिगृह चालविण्यासाठी घेतले आहे, त्यांना वर्ग करावी लागणार आहे. हे सर्व चित्र पाहता, मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतिगृह केवळ नावालाच उरते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होवू लागला आहे.

विद्यार्थ्यांनी फिरविली पाठ... वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. १ जुलैै पासून ही प्रक्रिया सुरू झाली. परंतु, ५ जुलैैपर्यंत एकाही विद्यार्थ्याने वसतिगृहासाठी अर्ज केलेला नाही. केवळ निवासाचीच सोय असल्याने विद्यार्थ्यांत निरूत्साह आहे.

मुलींच्या वसतिगृहाचे काय?मराठा समाजातील मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मुलांसाठीचे वसतिगृह सुरू होत असले तरी मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाकडे कसल्याही स्वरूपाची माहिती आली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStudentविद्यार्थी