शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बहीण मदतीला धावली, पुरात अडकलेल्या तरुणाचा पोलीस, ग्रामस्थांच्या धाडसामुळे जीव वाचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:15 IST

पुरात अडकलेल्या भावाने फोन करताच बहीण मदतीला धावली, पोलीस अन् गावकऱ्यांनी 'पुलावर पाणी असूनही' जिवाची बाजी लावत वाचवले प्राण

- संतोष वीरभूम (धाराशिव): परांडा तालुक्यातील वाकडी पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका तरुणाचा जीव पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून वाचविला. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हनुमंत कांबळे हा तरुण १६ सप्टेंबर रोजी बार्शी येथे आपल्या बहिणीकडे गेला होता. पावसामुळे त्याने एक दिवस मुक्काम केला आणि १७ सप्टेंबर रोजी पहाटे साकत येथे जनावरांची धार काढण्यासाठी मोटारसायकलने निघाला. वाकडी फाट्यावर पोहोचल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याचे पाहून तो थांबला. मात्र, त्याला उशीर होत असल्यामुळे त्याने दुचाकी पाण्यातून नेण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या मध्यभागी पोहोचताच त्याची मोटारसायकल बंद पडली आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. त्याचबरोबर हनुमंत कांबळेही प्रवाहाच्या जोरदार लोंढ्यात सापडला. मात्र, त्याने समयसूचकता दाखवत तात्काळ जवळच्या चिलारीच्या झाडाचा आधार घेतला आणि स्वतःला वाचवले. त्यानंतर त्यांनी तातडीने बहिणीला फोन करून मदतीची याचना केली.

बहीण मदतीला धावली, गावकऱ्यांनी साथ दिलीबहिणीला घटनेची माहिती मिळताच ती आणि तिचा मेहुणा लगेचच पुलावर पोहोचले. त्यांना आपल्या भावाला पाहून हंबरडा फोडल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. गावकरी तात्काळ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि शाबाज शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी गावातील राहुल कारभारी, अजित रगडे, विशाल लोंढे, अक्षय पाठक, श्रीराम जगताप आणि सुजित शिंदे यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहत्या पाण्यात वायरोप (दोरी) घेऊन त्यांनी हनुमंत कांबळे यांना सुरक्षित बाहेर काढले. सुमारे एक तास पाण्यात अडकल्यामुळे घाबरलेल्या हनुमंतला पोलीस व ग्रामस्थांनी धीर दिला आणि सुरक्षित त्याच्या गावाकडे पोहोचवले.

पुलाची उंची वाढवण्याची मागणीदरम्यान, १९७८ साली बांधलेला हा वाकडी पूल अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुसळधार पावसामुळे वारंवार पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. भूम तालुक्यातील नागरिकांना बार्शी, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या घटनेनंतर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांमधून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूर