शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

बहीण मदतीला धावली, पुरात अडकलेल्या तरुणाचा पोलीस, ग्रामस्थांच्या धाडसामुळे जीव वाचला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 16:15 IST

पुरात अडकलेल्या भावाने फोन करताच बहीण मदतीला धावली, पोलीस अन् गावकऱ्यांनी 'पुलावर पाणी असूनही' जिवाची बाजी लावत वाचवले प्राण

- संतोष वीरभूम (धाराशिव): परांडा तालुक्यातील वाकडी पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका तरुणाचा जीव पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून वाचविला. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हनुमंत कांबळे हा तरुण १६ सप्टेंबर रोजी बार्शी येथे आपल्या बहिणीकडे गेला होता. पावसामुळे त्याने एक दिवस मुक्काम केला आणि १७ सप्टेंबर रोजी पहाटे साकत येथे जनावरांची धार काढण्यासाठी मोटारसायकलने निघाला. वाकडी फाट्यावर पोहोचल्यावर पुलावरून पाणी वाहत असल्याचे पाहून तो थांबला. मात्र, त्याला उशीर होत असल्यामुळे त्याने दुचाकी पाण्यातून नेण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या मध्यभागी पोहोचताच त्याची मोटारसायकल बंद पडली आणि ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागली. त्याचबरोबर हनुमंत कांबळेही प्रवाहाच्या जोरदार लोंढ्यात सापडला. मात्र, त्याने समयसूचकता दाखवत तात्काळ जवळच्या चिलारीच्या झाडाचा आधार घेतला आणि स्वतःला वाचवले. त्यानंतर त्यांनी तातडीने बहिणीला फोन करून मदतीची याचना केली.

बहीण मदतीला धावली, गावकऱ्यांनी साथ दिलीबहिणीला घटनेची माहिती मिळताच ती आणि तिचा मेहुणा लगेचच पुलावर पोहोचले. त्यांना आपल्या भावाला पाहून हंबरडा फोडल्याने गावकऱ्यांचे लक्ष वेधले गेले. गावकरी तात्काळ घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील कोळेकर आणि शाबाज शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी गावातील राहुल कारभारी, अजित रगडे, विशाल लोंढे, अक्षय पाठक, श्रीराम जगताप आणि सुजित शिंदे यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. वाहत्या पाण्यात वायरोप (दोरी) घेऊन त्यांनी हनुमंत कांबळे यांना सुरक्षित बाहेर काढले. सुमारे एक तास पाण्यात अडकल्यामुळे घाबरलेल्या हनुमंतला पोलीस व ग्रामस्थांनी धीर दिला आणि सुरक्षित त्याच्या गावाकडे पोहोचवले.

पुलाची उंची वाढवण्याची मागणीदरम्यान, १९७८ साली बांधलेला हा वाकडी पूल अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने गैरसोयीचा बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुसळधार पावसामुळे वारंवार पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प होते. भूम तालुक्यातील नागरिकांना बार्शी, पुणे, कोल्हापूर आणि मुंबईला जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. या घटनेनंतर पुलाची उंची वाढवून नवीन पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांमधून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :dharashivधाराशिवfloodपूर