शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
2
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
3
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
4
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
5
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
6
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावास संपवलं; बहुचर्चित खून खटल्यात दाेघांना जन्मठेप

By बाबुराव चव्हाण | Published: January 24, 2024 5:45 PM

धाराशिव न्यायालयाचा निकाल : दहा हजार रूपये दंडही ठाेठावला

धाराशिव : ‘तुला आपली एकत्र असलेली शेती विकण्यासाठी माझी व आईची संमती हवी आहे काय?’अशी विचारणा करीत सख्खा भाऊ असलेले लक्ष्मण येडगे यांना जमिनीवर पाडले. मेहुण्याला त्यांचे दाेन्ही हात धरायला लावून दगडाने ठेचले. या घटनेत लक्ष्मण यांचा मृत्यू झाला. ही घटना तुळजापूर तालुक्यातील आरळी ते चिवरी शेतरस्त्यावर २०२० मध्ये घडली हाेती. हा बहुचर्चित खून खटला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात चालला. समाेर आलेले पुरावे आणि साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. जे. माेहिते यांनी दाेघा आराेपींना २४ जानेवारी राेजी जन्मठेप अणि दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठाेठावली.

तुळजापूर तालुक्यातील येवती येथील धनाजी विनायक गवळी व त्यांचा मित्र लक्ष्मण मारूती येडगे हे २१ ऑक्टाेबर २०२० राेजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आरळी-चिवरी शेत रस्त्यालगत असलेल्या शेतात गेले हाेते. लक्ष्मण येडगे हे शेतातील गवत कापत असतानाच साधारपणे दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रामचंद्र मारूती येडगे व त्यांचा मेहुणा हरीश सायप्पा माशाळे (रा. मदरे, ता. दक्षिण साेलापूर) हे दुचाकीवरून शेतात आले. या दाेघांनी लक्ष्मण येडगे यांना राेडवर बाेलावून घेतले. ‘तू आई व माझ्या पत्नीला शिवगाळ का केली?’’ अशा शब्दात जाब विचारीत रामचंद्रने भाऊ लक्ष्मणला जमिनीवर पाडले. तर हरीश माशाळे याने त्यांचे दाेन्ही हात धरून ठेवले. 

यानंतर रामचंद्रने बाजुलाच पडलेला दगड घेऊन ताेंडावर, नाकावर, डाेक्यात जाेराने मारले. ‘‘तुला आपली एकत्र असलेली शेती विकण्यासाठी माझी व आईची संमती हवी आहे काय, अशी विचारणा करीत आणखी रामचंद्र येडगे याने दगडाने मारले. येथून जाणारे काही लाेक भांडण साेडविण्यासाठी गेले असता, ‘‘तुम्ही आमच्यामध्ये पडू नका. तुम्हालाही मारू’’, अशी धमकी दिली. त्यामुळे हे लाेक तेथून निघून गेले. ताेवर लक्ष्मण येडगे यांची हालचाल बंद झाली असता भाऊ रामचंद्र येडगे व त्यांचा मेहुणा हरिष माशाळे घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर काेणी तरी डाॅक्टरांनी फाेन केला असता, तिथे रूग्णवाहिका दाखल झाली. या रूग्णवाहिकेतून लक्ष्मण येडगे यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल केले असता, तपासून डाॅक्टरांनी मयत घाेषित केले.

दरम्यान, या प्रकरणी २१ ऑक्टाेबर २०२० राेजी नळदुर्ग पाेलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. तपास करून पाेनि जगदिश राऊत यांनी न्यायालयासमाेर दाेषाराेपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयासमाेर चालला असता, आठ साक्षीदार तपासण्यात आले. समाेर आलेले साक्षीपुरावे व जिल्हा शासकीय अभियाेक्ता शरद जाधवर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश व्ही. जे. माेहिते यांनी आराेपी राम उर्फ रामचंद्र मारूती येडगे व हरीश सायप्पा माशाळे या दाेघांना दाेषी ग्राह्य धरले. या दाेन्ही आराेपींना जेन्मठेप व दहा हजार रूपये दंडाची शिक्षा ठाेठावण्यात आली. अभियाेग पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियाेक्ता शरद जाधवर यांनी बाजू मांडली.

आठ साक्षीदार तपासलेनळदुर्ग पाेलिसांनी तपास करून न्यायालयामध्ये दाेषाराेपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने जवळपास आठ साक्षीदार तपासले. या साक्षीदारांच्या साक्ष आणि समाेर आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दाेघा आराेपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय