शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

रासायनिक खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 7:59 PM

प्रतिबॅग १०० ते २०० रूपयांपर्यंत केली वाढ

उस्मानाबाद : दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. असे असतानाच हंगामापूर्वीच  खतांच्या दरामध्ये वाढ करून सरकारने शेतकऱ्यांना ‘शॉक’ दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खत उत्पादक कंपन्यांनी ५० किलोच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रूपयांची वाढ केली आहे.

एक -दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची घडी पूर्णत: विस्कटली आहे. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. अशा अडचणींच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करून ‘शॉक’ देण्याचे काम केले आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतकऱ्यांच्या खिशाला अवडजड होणारी आहे. ५० किलोे वजनाच्या प्रति बॅगमागे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १०० ते २०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

‘डीएपी’ खताच्या एका बॅगसाठी पूर्वी १ हजार २८० रूपये मोजावे लागत होते. आता शेतकऱ्यांना ‘डीएपी’च्या एका बॅगसाठी आता १ हजार ४७७ रूपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या खिशाला १९७ रूपयांची जास्तीची झळ बसणार आहे. १०:२६:२६ या खताची बॅग गतवर्षी शेतकऱ्यांना १ हजार १८३ रूपयांना मिळत असे. आता १ हजार ४०० रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एक बॅगमागे २१७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना या खताची बॅग केवळ ९९७ रूपयांत मिळत असे. आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रूपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच बॅगमागे १०३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दुष्काळ आणि नापिकसारख्या संकटामध्ये पिचलेल्या शेतकऱ्यांना खताच्या दरामध्ये केलेली वाढ आर्थिक संकटांच्या गर्तेत लोटणारी आहे. त्यामुळे सदरील दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.

दृष्टिक्षेपात दरवाढखत        पूर्वी    सध्या१२:३२:१६    १२९०    १४६५१४:३५:१४    १२७५    १४७५२०:२०:१३    ९९७    ११००१०:२६:२६    ११८३    १४००डी.ए.पी.    १२८०    १४७७(५० किलो बॅगचे दर)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र