शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

रासायनिक खतांच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना ‘शॉक’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 20:00 IST

प्रतिबॅग १०० ते २०० रूपयांपर्यंत केली वाढ

उस्मानाबाद : दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडून पडले आहे. असे असतानाच हंगामापूर्वीच  खतांच्या दरामध्ये वाढ करून सरकारने शेतकऱ्यांना ‘शॉक’ दिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खत उत्पादक कंपन्यांनी ५० किलोच्या प्रति बॅगमागे १०० ते २०० रूपयांची वाढ केली आहे.

एक -दोन वर्षाआड दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. यंदा भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप तसेच रबी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती उत्पादन खर्चही पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणाची घडी पूर्णत: विस्कटली आहे. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. अशा अडचणींच्या फेऱ्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना खत उत्पादक कंपन्यांनी हंगामापूर्वीच दरवाढ करून ‘शॉक’ देण्याचे काम केले आहे. गतवर्षी सरकारने अनुदानात कपात केल्यानंतर खत उत्पादक कंपन्यांनी दर वाढविले आहेत. सदरील दरवाढ शेतकऱ्यांच्या खिशाला अवडजड होणारी आहे. ५० किलोे वजनाच्या प्रति बॅगमागे थोडेथोडके नव्हे, तर तब्बल १०० ते २०० रूपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 

‘डीएपी’ खताच्या एका बॅगसाठी पूर्वी १ हजार २८० रूपये मोजावे लागत होते. आता शेतकऱ्यांना ‘डीएपी’च्या एका बॅगसाठी आता १ हजार ४७७ रूपये वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या खिशाला १९७ रूपयांची जास्तीची झळ बसणार आहे. १०:२६:२६ या खताची बॅग गतवर्षी शेतकऱ्यांना १ हजार १८३ रूपयांना मिळत असे. आता १ हजार ४०० रूपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच एक बॅगमागे २१७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. असेच चित्र २०:२०:१३ या खताच्या दराबाबत आहे. गतवर्षी शेतकऱ्यांना या खताची बॅग केवळ ९९७ रूपयांत मिळत असे. आता या खताच्या बॅगसाठी १ हजार १०० रूपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच बॅगमागे १०३ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. दुष्काळ आणि नापिकसारख्या संकटामध्ये पिचलेल्या शेतकऱ्यांना खताच्या दरामध्ये केलेली वाढ आर्थिक संकटांच्या गर्तेत लोटणारी आहे. त्यामुळे सदरील दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून जोर धरू लागली आहे.

दृष्टिक्षेपात दरवाढखत        पूर्वी    सध्या१२:३२:१६    १२९०    १४६५१४:३५:१४    १२७५    १४७५२०:२०:१३    ९९७    ११००१०:२६:२६    ११८३    १४००डी.ए.पी.    १२८०    १४७७(५० किलो बॅगचे दर)

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र