शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शिवराज्याभिषेक सोहळ्यात 'रयतेचा सन्मान', आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयास पूजेचा मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:56 IST

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली.

उस्मानाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. मात्र, यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे राज्याभिषेक सोहळ्यात महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करीत असताना युवराज संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजेंसोबत राजसदरेवर बसण्याचा बहुमान एका शेतकरी कुटुंबाला देण्यात आला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी आणि वडिलांना राज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसविण्यात आले होते. रयतेच्या राजाच्या राज्याभिषेकाचा मान रयतेला मिळाला पाहिजे, असे म्हणत छत्रपती संभाजीराजे यांनी शेतकरी कुटुंबाला हा सन्मान दिला. 

रायगडावरीलशिवराज्याभिषेक सोहळ्याला रयतेच्या प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचार या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या शेतकरी कुटूंबियाच्या हस्ते पूजनही झाले. तसेच, त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनावेळी मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे, यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी शेतकरी कुटुंबीयाचा सन्मान करण्यात आला. लक्ष्मण अवचार यांनी नापिकी, दुष्काळीस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे 19 मे 2015 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. वयाच्या 25 व्या वर्षी लक्ष्मण यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या जाण्याने अवचार कुटंबियांवर मोठे संकट उभारले. तर, वडिल गणपती, आई चिवाबाई, पत्नी रेश्मा यांना मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळेच, छत्रपती संभाजी महाराजांनी विशेष निमंत्रण देऊन या शेतकरी कुटुंबीयास शिवराज्याभिषेकावेळी राजसदरेवर बसण्याचा बहुमान दिला. रयतेच्या हस्ते राज्याभिषेक झाल्याने हा सोहळा खऱ्या अर्थाने रयतेचा सोहळा ठरेल, असे छत्रपती संभजीराजे यांनी म्हटले होते. त्यानुसार, अवचार कुटुंबीयांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषांत अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivrajyabhishekशिवराज्याभिषेकFarmerशेतकरी