शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आदित्यसाहेब, वाघनखं खरी की खाेटी हे कसं ठरवणार? शहाजी बापू पाटील यांचा प्रहार

By बाबुराव चव्हाण | Updated: October 1, 2023 20:21 IST

एखादा माणूस तर सांगा, त्याला मी हुडकून काढताे.

बाबुराव चव्हाण, धाराशिव : राज्य सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं भारतात आणली जात आहेत. यावरही आता आदित्यसाहेबांनी शंका घेतली आहे. वाघनखं खरी की खाेटी ते बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, हे बघायला नेमकं कुणालां गाठलं पाहिजे हे काही त्यांनी सांगितलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला गाठताे अशा शब्दात शिवसेना आमदार (शिंदे गट) शहाजी बापू पाटील यांनी प्रहार केला.

धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी पंधरा महिन्यात ५ हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल युथ फाेरमच्या पुढाकारातून रविवारी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार साेहळा पार पडला. याप्रसंगी ते बाेल हाेते.

आ. शहाजी पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं इंग्लंडमधून भारतात आणली जाताहेत. तुम्हा-आम्हांसाठी ही गाेष्ट अभिमानाची आहे. मात्र, आदित्यसाहेबांनी वाघनखांबाबतच शंका उपस्थित केली. वाघनखं खरी की खाेटी, हे बघा असं त्यांचं म्हणंण आहे. हे बघण्यासाठी नेमकं काेणाला गाठलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला जावू गाठताे. त्याला हुडकूनही काढताे. यासाठी बाळा, अगाेदर नाव तर सांग, अशा शब्दात ठाकरेंवर सडकून टिका केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परदेशात जावून उद्याेगाच्या माध्यमातून कराेडाे-कराेडाेची गुंतवणूक राज्यात आणत आहेत. यावरूनही आदित्य ठाकरे टिका करताहेत. दरराेज परदेशात कशाला जाताहेत, असा प्रश्न विचारताहेत. हेच आदित्य ठाकरे पर्यटणमंत्री असताना किमान २५ वेळा परदेश दाैऱ्यावर गेले हाेते. तेव्हा परदेशात जावून ते काय करीत हाेते, असा खाेचक सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे भेटलेच नाहीत...

उध्दवसाहेब मुख्यमंत्री असताना दाेन वर्षांच्या काळात कधी भेटलेच नाहीत. आम्ही कामे घेऊन जायचाे, मात्र त्यांची भेट व्हायची नाही. त्यामुळे मतदारसंघातील लाेकांची कामं हाेत नव्हती. आणि मुख्यमंत्री भेटत नाहीत हे जनतेला सांगताही येत नव्हतं. परंतु, आता तसं नाही. काेणतंही काम घेऊन जा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट देतात अन् कामेही मार्गी लावतात, असे आ.शहाजी बापू पाटील म्हणाले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना