शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आदित्यसाहेब, वाघनखं खरी की खाेटी हे कसं ठरवणार? शहाजी बापू पाटील यांचा प्रहार

By बाबुराव चव्हाण | Updated: October 1, 2023 20:21 IST

एखादा माणूस तर सांगा, त्याला मी हुडकून काढताे.

बाबुराव चव्हाण, धाराशिव : राज्य सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं भारतात आणली जात आहेत. यावरही आता आदित्यसाहेबांनी शंका घेतली आहे. वाघनखं खरी की खाेटी ते बघा, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र, हे बघायला नेमकं कुणालां गाठलं पाहिजे हे काही त्यांनी सांगितलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला गाठताे अशा शब्दात शिवसेना आमदार (शिंदे गट) शहाजी बापू पाटील यांनी प्रहार केला.

धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी पंधरा महिन्यात ५ हजार कोटींचा निधी आणल्याबद्दल युथ फाेरमच्या पुढाकारातून रविवारी भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार साेहळा पार पडला. याप्रसंगी ते बाेल हाेते.

आ. शहाजी पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. राज्यातील महायुती सरकारच्या पुढाकारातून शिवरायांचे वाघनखं इंग्लंडमधून भारतात आणली जाताहेत. तुम्हा-आम्हांसाठी ही गाेष्ट अभिमानाची आहे. मात्र, आदित्यसाहेबांनी वाघनखांबाबतच शंका उपस्थित केली. वाघनखं खरी की खाेटी, हे बघा असं त्यांचं म्हणंण आहे. हे बघण्यासाठी नेमकं काेणाला गाठलं पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं नाही. ते नाव आदित्य ठाकरेनं सांगावं, मी त्याला जावू गाठताे. त्याला हुडकूनही काढताे. यासाठी बाळा, अगाेदर नाव तर सांग, अशा शब्दात ठाकरेंवर सडकून टिका केली. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री परदेशात जावून उद्याेगाच्या माध्यमातून कराेडाे-कराेडाेची गुंतवणूक राज्यात आणत आहेत. यावरूनही आदित्य ठाकरे टिका करताहेत. दरराेज परदेशात कशाला जाताहेत, असा प्रश्न विचारताहेत. हेच आदित्य ठाकरे पर्यटणमंत्री असताना किमान २५ वेळा परदेश दाैऱ्यावर गेले हाेते. तेव्हा परदेशात जावून ते काय करीत हाेते, असा खाेचक सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्री असताना उध्दव ठाकरे भेटलेच नाहीत...

उध्दवसाहेब मुख्यमंत्री असताना दाेन वर्षांच्या काळात कधी भेटलेच नाहीत. आम्ही कामे घेऊन जायचाे, मात्र त्यांची भेट व्हायची नाही. त्यामुळे मतदारसंघातील लाेकांची कामं हाेत नव्हती. आणि मुख्यमंत्री भेटत नाहीत हे जनतेला सांगताही येत नव्हतं. परंतु, आता तसं नाही. काेणतंही काम घेऊन जा, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट देतात अन् कामेही मार्गी लावतात, असे आ.शहाजी बापू पाटील म्हणाले.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना