शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

निकष ठेवा बाजूला, आधी दुष्काळ जाहीर करा; शेतकरी पुत्रांची आक्रमक मागणी

By चेतनकुमार धनुरे | Updated: September 1, 2023 13:17 IST

'पिके करपून गेली आहेत. पण शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.'

कळंब (जि. धाराशिव) : संपुर्ण ऑगस्ट कोरडा गेलाय, यात खरीपातील प्रमूख पीक होरपळून गेलेय. यामुळे नियमाच्या आडकाठी घालत नव्हे तर सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या या मागणीसाठी कळंब येथे शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

कळंब तालुक्यातील ६८ हजार हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन पीक होरपळत आहे. पावसाच्या बाबतीत जून असातसाच केला. जुलै रिमझिम पावसाचा ठरला. ऑगस्ट तर जवळपास कोरडाच.यामुळे पिके करपून गेली आहेत. यातच शासन २१ दिवसाचा खंड, नियम, निकषाच्या चौकटीत वेळ घालवत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना सरसकट प्रतिहेक्टरी मदत द्यावी, नियम व अटी लादू नयेत या मागणीसाठी वाळलेल्या सोयाबीनचे काड सोबत घेत कळंब येथील तहसील कार्यालयासमोर शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. यात शुभम राखुंडे, भिमा हगारे, शशिकांत पाटील, प्रतिक गायकवाड, विपूल देशमुख, गोकुळ घोगरे, अमर मडके, अशोक जगताप, विठ्ठल यादव यांनी धनंजय ताटे आदी शेतकरी सहभागी झाले आहेत. या आंदोलनास आ. कैलास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा श्रीधर भवर, शिवसेनेचे दिपक जाधव आदींनी भेट देत पाठींबा दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीOsmanabadउस्मानाबाद