शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

दुसऱ्या लाटेत काही दिवसातच रुग्णसंख्या पाचशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST

कळंब : पहिल्या लाटेत नऊ महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारापार गेली होती. आता दुसऱ्या लाटेत अवघ्या काही दिवसातच ...

कळंब : पहिल्या लाटेत नऊ महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या दोन हजारापार गेली होती. आता दुसऱ्या लाटेत अवघ्या काही दिवसातच आकडा पाचशे पार झाल्याने गंभीर वृद्धी नोंदली गेली आहे. या स्थितीत गावगाड्यात मात्र मागच्या सारखी यंत्रणा ‘अ‍ॅक्टिव्ह’ दिसत नसून मास्क, डिस्टन्स, ट्रेसिंग यावर दुर्लक्ष दिसत असतानाच घोळक्यांना, टोळक्यांना अन् यामधील टाेळक्यांना नेमका ‘आवर’ घालायचा कोणी असा चिंतेत भर घालणारा प्रश्न पडत आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात ‘लॉकडाऊन’ झाले होते. यानंतर पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा व स्थानिक लोकांच्या मदतीने या लॉकडाऊनचा काटेकोर अंमल झाला होता. जिल्हाबंदी झाल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातून गावगाड्यात येणाऱ्या लोकांवर मर्यादा आल्या होत्या. गावागावात कोरोना कक्ष कार्यान्वित झाले होते. अंगणवाडी सेविका ते आशाताई ‘डोअर टू डोअर’ शोध घेत होत्या तर गावागावात गुरूजींनी ही तितकीच महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलीस अन् पोलीस पाटील तसेच कोतवालांच्या हातातील काठीचा लोकांत धाक होता. एकूणच कोरोनाच्या पहिल्या लाटेत गावगाड्यात प्रशासन सातत्याने ‘अ‍ॅक्टिव्ह’ मोडवर होते. गटविकास अधिकारी ते तहसीलदार यांच्या ‘व्हिजिट’ ते ‘कंटेन्टमेंट’ करण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी यांची धावपळ असायची. एवढ्या तगड्या ‘नाकाबंदी’चा सामना करतही कोरोनाने तालुक्यातील सत्तरेक गावाची वेस ओलांडली होती.

एप्रिल ते डिसेंबर या काळात जवळपास १ हजार ३०० बाधित रूग्णांची गावगाड्यात नोंद झाली होती. शहरातील ८०० रूग्णांच्या तुलनेत हा आकडा तसा दखलपात्रच होता. यात ग्रामीण भागातील ३५ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शिराढोण, डिकसळ, येरमाळा, मस्सा आदी गावात वाढत्या रूग्णसंख्येमुळे भीतीचे वातावरण झाले होते. एकूणच पहिल्या लाटेतही कोरोनाने तालुक्यातील प्रशासन व जनतेला ‘गांभीर्याने घ्या’ असा संदेश दिला होता. तद्नंतर अनलॉकच्या पर्वात रूग्णांची संख्या कमी होत असल्याने अनेकांनी सुस्कारा टाकला असतानाच हळूहळू दुसऱ्या लाटेचा प्रकोप अधिक वेगाने आपली व्याप्ती वाढवत असल्याचे दिसून येत आहे. मागच्या सव्वा महिन्यात हा आकडा पाचशेच्या घरात पोहचला आहे. यामुळे पहिल्या लाटेचे दोन हजार अन् दुसऱ्या लाटेतील अवघ्या काही दिवसातील पाचशेचा आकडा निश्चितच धास्ती वाढवणारा असा आहे.

चौकट...

घोळक्यांचा अन् टोळक्यांचा बंदोबस्त कोण करणार

दुसऱ्या लाटेत कोरोना अधिक गंभीर बनत चालला आहे. आकडा वाढत आहे. स्थिती बिघडत चालली आहे. असे असले तरी मास्क, हायजीन आणि फिजिकल डिस्टन्स हे वैयक्तिक पातळीवरील ‘सुरक्षा कवच’ अनेकांच्या लेखी गौण दिसून येत आहे. गावोगावच्या पारावर, कट्‌ट्यावर, चौकात, बसथांब्यावर अकारण थांबणाऱ्या, चर्चेचं गुऱ्हाळ चालणाऱ्या टोळक्यांचा वावर दिसून येत आहे. गांभीर्यांचा अभाव असणाऱ्या या टोळक्यांतील ‘टाेळक्यांना’ कोण आवर घालणार? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

त्यांना पुन्हा ‘सतर्क’ करावे लागेल

वैयक्तिक पातळीवर बेलगाम वागत असलेल्या लोकांना आवर घालण्यासाठी गावपातळीवरच्या प्रशासनाला अ‍ॅक्टिव्ह करावे लागणार आहे. स्थानिक ग्रा. पं., कोरोना योद्धे, ग्रामरक्षा दल, पोलीस पाटील, कोतवाल यांनी संयुक्तरीत्या मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. ग्रामस्तरावरील ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, शिक्षक यासह सर्व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देणे गरजेच आहे. हॉटस्पॉटवरून आलेले लोक, होम आयसोलेशन, हाय व लो रिस्क कॉन्टॅक्ट, कंटेन्टमेंट यावर ‘फोकस’ करणे गरजेचं आहे. तरच येणाऱ्या काळात वाढत्या आलेख उतरता होण्याची शक्यता आहे.