शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

शाळांनी स्पर्धा परीक्षेचे नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:31 IST

उमरगा : शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा कल हा अनुभवी शिक्षकांना समजत असतो. शालेय बोर्ड परीक्षेत ९० टक्क्यांच्या वर गुण घेणारे ...

उमरगा : शालेय जीवनात विद्यार्थ्यांचा कल हा अनुभवी शिक्षकांना समजत असतो. शालेय बोर्ड परीक्षेत ९० टक्क्यांच्या वर गुण घेणारे विद्यार्थी निश्चितच एमपीएससी स्पर्धा परीक्षेत पास होऊ शकतात; परंतु यासाठी शाळेनेही शालेय अभ्यासक्रमासोबत सहशालेय उपक्रम म्हणून स्पर्धा परीक्षेचे नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव यांनी केले.

येथील शरणप्पा मलंग विद्यालयात श्री गणेश व्याख्यानमालेत ‘विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष एस. के. मलंग, तर प्रमुख पाहुणे म्हणून शांतिदूत परिवाराच्या संस्थापिका विद्याताई जाधव, वीरशैव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. एस. मलंग, सचिव सुरेखाताई मलंग, संस्थेचे ज्येष्ठ सदस्य विजयकुमार पाटील आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मनात असलेली भीती दूर करून मोठा अधिकारी होण्याची स्वप्न पाहावीत. त्यासाठी काहीही करण्याची जिद्द, अभ्यासात सातत्य व प्रत्येक विषयातील गटाची शोध प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन जाधव यांनी केले. कार्यक्रमाला रेखाताई सूर्यवंशी, प्रा. युसूफ मुल्ला, मुख्याध्यापक अजित गोबारे, कविराज रेड्डी, महादेव पंच कमिटीचे अध्यक्ष सखाराम भातागळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन परमेश्वर सुतार यांनी केले, तर आभार मीनाक्षी हत्ते यांनी मानले. कार्यक्रमासाठी शरणप्पा मलंग विद्यालयाचे शिक्षक राजकुमार जाधव, सतीश कटके, विवेकानंद पाचंगे, बालाजी हिप्परगे, परमेश्वर कोळी, प्रभावती बिराजदार, कलशेट्टी पाटील, दुषंत कांबळे, मोहन साखरे आदींनी परिश्रम घेतले.