शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

जादा दराने बियाणे-खत विक्री, ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रार; धाराशिवमध्ये १० परवाने निलंबित

By बाबुराव चव्हाण | Updated: June 1, 2023 18:50 IST

शेतकऱ्यांची लुबाडणूक; जादा दराने खताची विक्री, साठाही जुळेना !

धाराशिव - खरीप पेरणीपूर्वीच जिल्ह्यातील काही कृषी दुकानदारांकडून जादा दराने खत शेतकऱ्यांच्या  माथी मारून आर्थिक लुबाडणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘कृषी’च्या झाडाझडतीतून समाेर आला आहे. अशा १० दुकानदारांना परवाना निलंबनाचा दणका दिला आहे. तर तिघांना ताकीद दिली. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार दाखल करता येणार आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना निर्धारित दरात खत, बी-बियाणे मिळावे, यासाठी कृषी विभागाकडून जिल्हाभरातील कृषी दुकानांची झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी समाेर आल्या आहेत. काही विक्रेत्यांनी निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने खत शेतकर्यांच्या माथी मारले आहे. काहींकडील उपलब्ध खत आणि ई-पाॅश मशीनवरील साठा जुळत नाही. तर काहींनी परवान्यात समाविष्ट असलेल्या स्त्राेतांशिवाय इतरांकडून निविष्ठा खरेदी केल्या आहेत. काहींनी तर आपल्याकडे किती खत शिल्लक आहे? ते काेणत्या प्रकारचे आहे? किती विक्री झाले आहे? अशी कुठलीही नाेंद साठा रजिस्टरला केलेली नाही. खत खरेदी केल्यानंतर शेतकर्यांना विहित नमुन्यातील पावत्याही दिल्या नाहीत. हे धक्कादायक प्रकार पाहून आता कृषी विभाग ॲक्शन माेडवर गेला आहे. संबंधित १० विक्रेत्यांविरूद्ध परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर तिघा विक्रेत्यांना सक्त ताकीद दिली आहे. या कारवाईमुळे नियमांना धाब्यावर बसविणारे विक्रेते धास्तावले आहेत.

तुळजापुरात सर्वाधिक गैरप्रकार...कृषी विभागाने कारवाई केलेल्या १० पैकी ५० टक्क्यांहून अधिक म्हणजेच सहा विक्रेते हे एकट्या तुळजापूर तालुक्यातील आहेत. यानंतर भूमचा क्रमांक लागताे. येथील ३ विक्रेत्यांवर बडगा उगारला आहे. तर लाेहार्यातील एका विक्रेत्याचा समावेश आहे. दरम्यान, ताकिद दिलेल्यांत भूममधील दाेन तर उमरग्यातील एकाचा समावेश आहे.

‘व्हाॅटस्ॲप’द्वारे करा तक्रारनिविष्ठा उपलब्धतेच्या व दराच्या अनुषंगाने तक्रारीचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांक ०२४७२-२२२३७९४ असा असून यावर ‘व्हाॅटस्ॲप’द्वारे देखील तक्रार स्विकारली जाणार आहे.-रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादagricultureशेतीFarmerशेतकरी