शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

नऊ एकरात फिरवला रोटाव्हेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

भूम : गेल्या २२ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा संपल्याने ...

भूम : गेल्या २२ दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची आशा संपल्याने तालुक्यातील आष्टा येथील शेतकरी तथा हभप सतीश कदम महाराज यांनी पाच एकर सोयाबीन व चार एकर उडीद पिकावर रोटाव्हेर फिरवला.

आष्टा शिवारात शेतकरी कदम महाराज यांची शेती आहे. यंदा खरीप हंगामाच्या प्रारंभी चांगला पाऊस झाल्याने या शिवारात सोयाबीन व उडीदाची पिके चांगली बहरली. त्यामुळे यातून चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. परंतु, २२ जुलैपासून पावसाने खंड दिल्याने पिकांनी पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. सोयबीनला कळ्या लागल्या होत्या. परंतु, पाण्याअभावी त्याही गळून पडल्या. असे असतानाही शेतकरी कदम यांनी तुषार सिंचनाच्या माध्यातून पाणी देण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत कळ्या गळून पडून पिके वाळून गेली होती. पाणी दिले तरी पिकांची वाढच खुंटल्याने त्यांनी १४ ऑगस्ट रोजी चक्क रोटाव्हेर फिरवून रान मोकळे केले.

तालुक्यात २३ दिवसांपासून पाऊस नसल्याने प्रत्यक्षात पेरणी झालेली खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. आता पाऊस पडला तरी या पिकास उपयोग होणार नसल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे खरीप हंगामावर शेतकऱ्यांनी रंगविलेली सगळी स्वप्ने धुळीस मिळाली असून, बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

कोट......

पेरणीसाठी रान तयार करण्यापासून ते पिके बहरात येईपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झाला. फवारणीसाठी जास्तीचे पैसे घालवले. परंतु, पाऊस न झाल्याने पिके जळून गेली. यातून उत्पन्नच मिळणार नसल्याने शेवटी सर्व पिकावर रोटाव्हेर फिरवला.

- सतीश कदम महाराज, शेतकरी