शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकर कोथिंबिरीच्या शेतात फिरविले रोटाव्हेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने वैतागून दोन एकर कोथिंबीर पिकात चक्क रोटाव्हेटर ...

जेवळी : लोहारा तालुक्यातील जेवळी येथील एका शेतकऱ्याने कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने वैतागून दोन एकर कोथिंबीर पिकात चक्क रोटाव्हेटर फिरविला. त्यामुळे शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

महिनाभरापासून या परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे उडीद, मूग आणि सोयाबीन पीक रानातच करपून गेले आहे. अशा परिस्थितीत पालेभाज्यांनाही अपेक्षित भाव मिळेनासा झाला आहे. कोथिंबिरीची विक्री होत नसल्याने दक्षिण जेवळी येथील शेतकरी दत्तात्रय होनाजे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातील कोंथिबीर पिकावर चक्क रोटाव्हेटर फिरविले असून, यामुळे या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. मुंबई बाजारपेठ बंद असून, हैदराबाद बाजारपेठेत भरपूर कोथिंबीर आहे. पुणे बाजारपेठेमध्ये आपला माल जात नाही. नागपूर बाजारपेठेत विक्री करणे परवडत नाही, अशी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून कमी दराने खरेदी केली जात आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

कोट.......

बाजारपेठेत कोथिंबिरीच्या कॅरेटला गेल्या आठवड्यात चारशे ते पाचशे रुपये कॅरेटचा दर मिळाला होता; परंतु व्यापाऱ्यांनी कोथिंबीर प्लांट पाहण्यासाठी आज येतो, उद्या येतो असे म्हणून एक आठवडा विलंब केला. या एका आठवड्यात एका कॅरेटचा दर तीस चाळीस रुपयावर आला आहे. एकरी पन्नास हजार रुपये उत्पन्न अपेक्षित असताना ते चार-पाच हजार रुपयांवर आले आहे. व्यापाऱ्यांनी केलेल्या टाळाटाळीमुळे मला लाखोंचा फटका सहन करावा लागला.

- दत्तात्रय होनाजे, शेतकरी, जेवळी