शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रस्ते रुतले गाळात, डागडुजीसाठी नागरिकांचे धाराशिव पालिकेवर चिखलफेक आंदोलन

By सूरज पाचपिंडे  | Updated: July 10, 2023 17:35 IST

मागील आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील विविध भागात भूमिगत गटाराची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते उखडले आहे.

धाराशिव : शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामामुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. परिणामी रस्त्यावर चिखल होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, वयोवृध्द व्यक्ती तसेच दुचाकीस्वार रस्त्यावरून घसरून पडत आहेत. असे असतानाही पालिकेकडून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी धाराशिव नगरपालिकेसमोर चिखल फेकून आंदोलन केले.

मागील आठ ते दहा महिन्यांपासून शहरातील विविध भागात भूमिगत गटाराची कामे सुरू आहेत. त्यामुळे अनेक भागातील रस्ते उखडले आहे. मात्र, त्यानंतर रस्त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही. परिणामी, पावसाळ्यात रस्ते चिखलमय होत आहेत. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. वयोवृध्द व्यक्ती व बालके रस्त्यावरून घसरून पडत आहेत. दुचाकीस्वारांना दुचाकी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. दुचाकीही घसरून अपघात घडत आहेत.

नारायण कॉलनी, गालीबनगर, शिरीन कॉलनी, निजामोद्दीन कॉलनी, रझा कॉलनी, सुलतानपुरा, शाहूनगर, संभाजीनगर, वृंदावन कॉलनी या भागातील रस्त्यांची अंत्यत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांनी सोमवारी नगरपालिकेसमोर एकत्र येत चिखलफेक आंदोलन केले. यावेळी रस्त्यावर त्वरित मुरुम टाकून दबाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली. आंदोलनात शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादMuncipal Corporationनगर पालिकाagitationआंदोलन