शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST

उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही ...

उस्मानाबाद - रस्त्यावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात टाळण्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग असणे गरजेचे आहे. ‘सडक सुरक्षा-जीवन रक्षा’ ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजयकुमार फड यांनी व्यक्त केले.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शुक्रवारी जिल्हा परिषदेतील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला गृहविभागाने काढलेल्या परिपत्रकाचे वाचन केले. यानंतर प्रत्येक मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले. रस्त्यावरील अपघाताशी माझा काही संबंध नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. कारण रस्त्याशी संबंध येत नाही, असा व्यक्ती असूच शकत नाही. कोणत्या ना कोणत्याप्रकारे वाहन चालविणे, वाहनात बसणे, रस्त्यावर पायी चालणे अशाप्रकारे प्रत्येकाचा रस्त्याशी संबंध हा येतच असतो. त्यामुळे प्रत्येकाने रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहनधारकाने वाहन चालविताना सर्व प्रकारची खबरदारी घेणे, रस्ता ओलांडताना दक्ष राहणे, वाहनात बसलेल्याने वाहन चालकास वाहन जोरात चालविण्यास किंवा नियमांचे उल्लंघन करून चालविण्यास भाग न पाडणे आदी बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास अपघाती घटना टळतील, असे डाॅ. फड म्हणाले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, कार्यकारी अभियंता (बां.) नितीन भोसले, कार्यकारी अभियंता दशरथ देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बळीराम निपाणीकर, कृषी विकास अधिकारी डाॅ. तानाजी चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता (ल. पा.) व्ही. व्ही. जोशी आदींची उपस्थिती हाेती.