शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

नदी, नाले, ओढ्यांना आला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबासह परिसरातील खंडाळा, वडगाव (ला), व्होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, सलगरा, किलज, देवसिंगा, गंधोरा, हंगरगा ...

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील काक्रंबासह परिसरातील खंडाळा, वडगाव (ला), व्होनाळा, बारूळ, जवळगा (मे), वानेगाव, सलगरा, किलज, देवसिंगा, गंधोरा, हंगरगा (तुळ) येथे गेल्या चार दिवसांपासून दररोज जोरदार पाऊस पडत आहे. शनिवारी रात्रीही जवळपास तीन तास मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढ्यांना पूर आला असून, काढणीस आलेल्या सोयाबीन पिकासह, कांदा, उडीद, मूग आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास शनिवारच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने या भागातील शेतकऱ्यांनी उसनवारी, व्याजाने पैसे काढून काळ्या आईची ओटी भरली. कोवळी पिके जोमदार दिसत असताना पावसाने जवळपास २० ते २५ दिवस दडी मारल्याने कोवळी पिके माना टाकू लागली होती;मात्र मध्यंतरी झालेल्या हलक्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले; मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने ओढ दिली. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार हे दिसत असताना सोयाबीनचा दरही दहा हजारांवर पोहोचला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या आठ दिवसात सोयाबीनचा भाव पाच हजारांवर आल्याने शेतकऱ्यांची घोर निराशा झाली होती. त्यातच आता निसर्गाचे अस्मानी संकट ओढवल्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.

दरम्यान, या भागात कांदा लागवडही मोठ्या प्रमाणात केली आहे. कांद्याचे फडच्या फड शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने वाहून गेले. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून विमा मंजूर करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

260921\img-20210926-wa0101.jpg

काक्रंबा परिसरात सोयाबीन पिकासह कांदा पिकाचे फडफड वाहून गेले चे दिसत आहे.