शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

कर्नाटकातील मराठी साहित्य संमेलनावर बंदीवर निषेधाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:42 IST

'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे.

उस्मानाबाद : कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलनावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याचा ठरावाद्वारे निषेध केला जाणार आहे.

संमेलनाने मराठी भाषिक चळवळीला बळ दिले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे. प्रत्येक प्रांतातील माणसाला आपली भाषा, साहित्य जपण्याचा, संमेलन भरवण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यावर बंदी घालत असेल, गदा आणत असेल तर केंद्र सरकारने त्यांना या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे.सीमेवरील स्थानिक लोक भाषेचे रक्षक आहेत. त्यांच्याशी कोणी प्रतारणा करणार असेल तर विचारवंत, साहित्यिक गप्प बसणार नाहीत.संमेलन मंचावरील घुसखोरीने उडाला गोंधळसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवादाच्या मंचावर अचानकपणे घुसखोरी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र, लगेच सर्व सुरळीत झाले.

‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले, वाढत आहे’, या विषयावर शनिवारी परिसंवाद होता. पहिले वक्ते बोलण्यास उभे राहिले असता, अचानकपणे लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील हे मंचावर चढले. त्यांनी मला बोलू द्या, माझी भूमिका मांडू द्या, त्यानंतरच मी मंचावरून उतरतो, असा पवित्रा घेतला. तितक्यात दहा ते बाराजण मंचावर आले होते. त्यामुळे गडबड होणार हे पाहून पोलिसांनी सर्वांनाच मंचावरून खाली आणले.

दरम्यान, मंचावर अचानकपणे गेलेले डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, प्रदर्शनात माझी पुस्तके आहेत. मी साहित्यिक, पत्रकार आहे. संत साहित्य आणि बुवाबाजी याबद्दल मला बोलायचे होते. शासनाने संत साहित्याचे विद्यापीठ स्थापन केले आहे. त्याबद्दल मी याचिकाही दाखल केली आहे. मी मंचावर असताना इतर दहा-बाराजण कोण आले होते, याची मला माहिती नाही.