शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कर्नाटकातील मराठी साहित्य संमेलनावर बंदीवर निषेधाचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 03:42 IST

'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे.

उस्मानाबाद : कुद्रेमनी येथील मराठी साहित्य संमेलनावर कर्नाटक सरकारने बंदी घातली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात याचा ठरावाद्वारे निषेध केला जाणार आहे.

संमेलनाने मराठी भाषिक चळवळीला बळ दिले. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, 'कर्नाटक सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. मराठी समाज त्याचा निषेध करत आहे. प्रत्येक प्रांतातील माणसाला आपली भाषा, साहित्य जपण्याचा, संमेलन भरवण्याचा अधिकार आहे. राज्य सरकार त्यावर बंदी घालत असेल, गदा आणत असेल तर केंद्र सरकारने त्यांना या चुकीची जाणीव करून दिली पाहिजे.सीमेवरील स्थानिक लोक भाषेचे रक्षक आहेत. त्यांच्याशी कोणी प्रतारणा करणार असेल तर विचारवंत, साहित्यिक गप्प बसणार नाहीत.संमेलन मंचावरील घुसखोरीने उडाला गोंधळसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवादाच्या मंचावर अचानकपणे घुसखोरी झाल्याने काही काळ गोंधळ उडाला. मात्र, लगेच सर्व सुरळीत झाले.

‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ वाढले, वाढत आहे’, या विषयावर शनिवारी परिसंवाद होता. पहिले वक्ते बोलण्यास उभे राहिले असता, अचानकपणे लातूर येथील डॉ. जगन्नाथ पाटील हे मंचावर चढले. त्यांनी मला बोलू द्या, माझी भूमिका मांडू द्या, त्यानंतरच मी मंचावरून उतरतो, असा पवित्रा घेतला. तितक्यात दहा ते बाराजण मंचावर आले होते. त्यामुळे गडबड होणार हे पाहून पोलिसांनी सर्वांनाच मंचावरून खाली आणले.

दरम्यान, मंचावर अचानकपणे गेलेले डॉ. जगन्नाथ पाटील म्हणाले, प्रदर्शनात माझी पुस्तके आहेत. मी साहित्यिक, पत्रकार आहे. संत साहित्य आणि बुवाबाजी याबद्दल मला बोलायचे होते. शासनाने संत साहित्याचे विद्यापीठ स्थापन केले आहे. त्याबद्दल मी याचिकाही दाखल केली आहे. मी मंचावर असताना इतर दहा-बाराजण कोण आले होते, याची मला माहिती नाही.