शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

उस्मानाबादचे निवासी डॉक्टर संपावर, 8 महिन्यांपासून विद्यावेतन मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2018 12:04 IST

गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने डॉक्टरांनी अखेर संप पुकारला आहे

उस्मानाबाद - उस्मानाबादचे निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने डॉक्टरांनी अखेर संप पुकारला आहे. संप पुकारण्यात आला असल्याने ओपीडी आणि आयपीडी बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरु राहतील, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. 

गेल्या आठ महिन्यांपासून विद्यावेतन न मिळालं असल्या कारणाने निवासी डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. विद्यावेतन न मिळाल्याने निवासी डॉक्टरांना साध्या गोष्टींसाठीही दुस-यांवर अवलंबून राहावं लागत असून साध्या गरजाही भागवता येत नाहीयेत. काही निवासी डॉक्टरांनी तर आपल्याला रिसर्च वर्कही थांबवावं लागलं असल्याचं सांगितलं आहे. 

निवासी डॉक्टरांनी आयुर्वेद संचलनालयाशी पत्रव्यवहार करत आपलं गा-हाणं मांडलं. मात्र तिथेही त्यांची निराशा झाली. कोणतंही समाधानकारक उत्तर त्यांना देण्यात आलं नाही. फोनवर बोलणं झालं त्यावेळी आमच्याशी उर्मट भाषेत संवाद साधण्यात आला. “तुम्हाला काय करायचं ते करा” असं बेजबाबदार उत्तर देण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळेच अखेर हतबल झालेल्या डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची आपण भेट घेणार आहोत असं काही डॉक्टरांनी सांगितलंय.  

टॅग्स :Osmanabadउस्मानाबाद